दत्त यागाचे फल

आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मात गुरु परंपरेला फार महत्व आहे. दत्तमहाराजांपासुन हि परंपरा आरंभ झाली असे मानले जाते. याग या शब्दाची व्याख्या पाहु मग आपण दत्तयागचे फला विषयी जाणुन घेउ.

देवतांच्या उद्देशाने केलेला हविर्द्रव्यांचा त्याग याला याग म्हटले जाते. दत्तमहाराजांचा अवतार का झाला? हे कऴले कि मग बरेच सुलभ होईल. राम कृष्ण नरसिंह वगैरे अवतार हे दुष्टांचे राक्षसांचे निर्दालन करण्याकरता झाले मग दत्तांनी अवतार घेउन कोणत्या राक्षसाचा वध केला? दत्तचरीत्रात याचे उत्तर नाहि असेच मिऴेल. मग अवताराचे कारण काय? तर स्वत:च्या शरीरातील काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ दर्प अभिमान हे सर्व रिपु नष्ट करावेत या करता हा अवतार झाला. बाकीच्या अवतारात देवतांनी राक्षस दुराचारी मारुन सज्जन भितीमुक्त केले. पण या दत्त अवतारात लोकांमधील दुर्गुण नष्ट व्हावे हा हेतु होता.

आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक तापत्रय निवारण होण्याकरता कामक्रोधादि रिपुंचा नाश होउन. असाध्य ते साध्य, वाग्मित्व, सर्वप्राणीमात्र वश व्हावेत, संपत्ती, भूमंडलाचे अधिपत्य सर्व भय चिंता परीहार व्हाव्यात या करता व दत्तप्रभुंच्या कृपेने आध्यात्मिक गती प्राप्त होउन पुढे सद्गुरुंची कृपा व्हावी व त्यायोगे मोक्षमार्ग वाटचाल सुलभ व्हावी या हेतुने जे स्मर्तृगामी आहेत केवऴ स्मरणमात्राने संतोषले जातात, महाभयांचा परीहार करतात, ज्ञान देतात, नेहमी चिदानंदात मग्न असतात, बालोन्मत्तपिशाच्च कोणत्याहि अवस्थेत असतात व माता अनुसयेस आनंद देतात त्या दत्तमहाराजांची कृपा व्हावी या करता दत्त याग करतात.

उपासना- अनंत जन्माची पुण्याई

दत्तात्रेय हे उपास्य दैवत असणे हि भाग्याची गोष्ट आहे, मात्र त्यांच्या पूजनात पावित्र्याचे पालन हि गोष्ट अत्यावश्यक ठरते. त्या पालनात काही त्रुटी राहिल्यास दंड ठरलेलाच. त्यात काही सूट नाही, पण ह्या पावित्र्याच्या कक्षा रुंदावत जर तुम्ही ह्या उपासनेत यशस्वी झालात तर मात्र तुमच्या एव्हडा भाग्यवान कोणी नाही, उपास्य दैवत असणं म्हणजे तुम्हाला दत्त महाराज प्रिय असणं आणि ह्या उपासनेत यशस्वी होणं म्हणजे दत्त महाराजांना तुम्ही प्रिय होणं हा फरक आहे. दत्त महाराजांची काय प्रतिज्ञा आहे? माझा जो भक्त आहे त्याचा उद्धार मी करणारच, सत्यसंध म्हटलं आहे त्यांना. नाना रुपधर असे ते आहेत, कधी कोणत्या रूपात तुम्हाला सामोरे येतील ते कळणार हि नाही, पण भेट देऊन जातील हे निश्चित. भक्तांसाठी अत्यंत कनवाळू आणि अभक्तांसाठी कठोर असे ते आहेत. इतक सगळं असताना दत्त भक्तांची संख्या फार मर्यादित दिसते याचे काय कारण असावे? तर दत्त भक्तीचे दुर्लभत्व, म्हणून आपण सगळे पाहत असतो कि बऱ्याच मंडळींना सांगून सुद्धा दत्त दत्त म्हणावेसे वाटत नाही. हे योग प्रारब्धात असावे लागतात. अनंत जन्मांची पुण्याई असली तरच दत्त भक्ती वाट्याला येते अन्यथा नाही.

॥सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त॥

श्रीदत्तावतार अन्य अवतारांप्रमाणे दुष्टांचा नाश करून विसर्जीत होणारा नाही. लोकोद्धाराकरिता चिरंजीव राहिलेला हा अवतार आहे. याशिवाय एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, या देवतेमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवता व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे. सृष्टीची उभारणी, जोपासना आणि संहार यासाठी कार्यरत असलेल्या या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजेच श्रीदत्तात्रेयाचा अवतार असे मानले जाते. 

‘तीन शिरें सहा हात’ अशा स्वरूपातील श्रीदत्तात्रेयांची ओळख आपल्याला अनेक सुबक रंगीत चित्रांमधून तसंच दत्तमंदिरांतील त्यांच्या साजिऱ्यागोजिऱ्या मूर्तीमधून आजवर घडत आली आहे. त्रिमुखी अथवा एकमुखी दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच दत्तपादुकांची पूजाअर्चाही अनेक ठिकाणी होत असते. प्रामुख्याने, महाराष्ट्रातील अनेक गावांमधून तसंच अगदी शहरातून देखील दर गुरुवारी श्रीदत्तात्रेयांची उपासना, भजन-पूजन व कीर्तनादी कार्यक्रमांची रेलचेल उडालेली दिसते. मार्गशीर्ष मास तसंच दत्तजयंतीच्या निमित्ताने श्रीगुरुचरित्र, श्रीगुरुलीलामृत, श्रीदत्तप्रबोध, श्रीदत्तमाहात्म्य अशा सांप्रदायिक ग्रंथांची पारायणे तसेच प्रसादाच्या सुंठवडय़ामधूनही श्रीदत्तमहाराज आपली ओळख टिकवून आहेत. नृसिंहवाडी, औदुंबर, गाणगापूर, माहूर, कारंजा इत्यादी श्रीदत्तक्षेत्रांतून आजही दत्तभक्तांची गर्दी उसळलेली आपण पाहतो. ‘गुरुमहाराज गुरू। जयजय परब्रह्म सद्गुरू’, ‘दिगंबरा दिगंबरा। श्रीपादवल्लभ दिगंबरा’, ‘दत्तात्रेय गुरू माझे आई। मजला ठाव द्यावा पायी’, ‘श्रीगुरुदेवदत्त’ असा नामगजर आणि जयघोष या दत्तस्थानांतून होत असल्याचेही आपण पाहतो.

लोकोद्धाराकरिता चिरंजीव राहिलेला हा अवतार आहे. तो अयोनिसंभव आहे असेही सांगितले जाते. दत्तावताराचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे, या देवतेमध्ये ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवता व त्यांच्या परंपरेचे ऐक्य आहे. सृष्टीची उभारणी, जोपासना आणि संहार यासाठी कार्यरत असलेल्या या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजेच श्रीदत्तात्रेयाचा अवतार असे मानले जाते. दशावतारातील प्रसिद्ध असे श्रीरामकृष्णादी अवतार क्षत्रियकुलात तर दत्तात्रेयावतार ब्रह्मकुलात जन्म घेता झाला. अवधूतावस्थेत सर्वत्र संचार करून वैराग्याचा पुरस्कार करणाऱ्या श्रीदत्तात्रेयांनी भक्तांना त्यांच्या श्रद्धेनुसार विविध वेषांत आणि रूपांत दर्शन दिल्याचे सांगितले जाते. दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पद्धतीची पुनस्र्थापना करणारा व मुख्यत: ब्राह्मणधर्माचा पुरस्कार करणारा असला, तरी इतर जातीजमातींना दत्तोपासनेसाठी प्रतिबंध नाही. श्रीदत्तात्रेय तसेच दत्तसंप्रदायाचा नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी, सकलमत व देवी आदी उपासनापंथांशीही संपर्क असल्याचे दिसून येते. दत्तप्रभूंच्या उपासनेत योगमार्गाला महत्त्वाचे स्थान असून शाक्त व तांत्रिक यांनीही दत्तात्रेयांना आपले दैवत मानले आहे. दत्त हे दैवत अविनाशी आहे, भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी संचारी आहे. सर्व भूतमात्रांचा अंतरात्मा म्हणजे विष्णूचा हा ‘दत्तात्रेय’ नामे प्रसिद्ध अवतार आहे. हा अवतार क्षमेने युक्त असून त्याने वेदांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, यज्ञसंस्थेचे पुनरुज्जीवन केले, चातुर्वण्र्यातील शिथिलता दूर केली, आणि अधर्म व असत्याचा नाश करून क्षीण होऊ घातलेल्या जनमानसात सामथ्र्य निर्माण केल्याचे मानले जाते.