शिव उपासना

शिव उपासना
शिव उपासना

श्रावण मॉस में दिन अनुसार शिवपूजा का फल

रविवार- पाप नाशक 
सोमवार- धन लाभ 
मंगलवार- स्वस्थ्य लाभ, रोग निवारण 
बुधवार- पुत्र प्राप्ति 
गुरूवार- आयु कारक
शुक्रवार- इन्द्रिय सुख 
शनिवार- सर्व सुखकारी 

श्रावण मॉस में शिव पूजा हेतु शास्त्रोक्त उत्तम स्थान

तुलसी, पीपल व वट वृक्ष के समीप 
नदी, सरोवर का तट, पर्वत की चोटी, सागर तीर 
मंदिर, आश्रम, तीर्थ अथवा धार्मिक स्थल, पावन धाम, गुरु की शरण 

शिव पूजा व पुष्प 

बिल्वपत्र- जन्म जन्मान्तर के पापो से मुक्ति (पूर्व जन्म के पाप आदि) 
कमल- मुक्ति, धन, शांति प्रदायक 
कुशा- मुक्ति प्रदायक 
दूर्वा- आयु प्रदायक 
धतूरा- पुत्र सुख प्रदायक 
आक- प्रताप वृद्धि 
कनेर- रोग निवारक 
श्रंघार पुष्प- संपदा वर्धक 
शमी पत्र- पाप नाशक 

बिल्वपत्र  की  महती 

शिव पुराण के अनुसार शिवलिंग पर कई प्रकार की सामग्री फूल-पत्तियां चढ़ाई जाती हैं । इन्हीं में से सबसे महत्वपूर्ण है बिल्वपत्र। बिल्वपत्र से जुड़ी खास बातें जानने के बाद आप भी मानेंगे कि बिल्व का पेड बहुत चमत्कारी है---

●पुराणों के अनुसार रविवार के दिन और द्वादशी तिथि पर बिल्ववृक्ष का विशेष पूजन करना चाहिए। इस पूजन से व्यक्ति ब्रह्महत्या जैसे महापाप से भी मुक्त हो जाता है।
●क्या आप जानते हैं कि बिल्वपत्र छ: मास तक बासी नहीं माना जाता। इसका मतलब यह है कि लंबे समय तक शिवलिंग पर एक बिल्वपत्र धोकर पुन: चढ़ाया जा सकता है या बर्फीले स्थानों के शिवालयों में अनुपलब्धता की स्थिति में बिल्वपत्र चूर्ण भी चढाने का विधान मिलता है।
●आयुर्वेद के अनुसार बिल्ववृक्ष के सात पत्ते प्रतिदिन खाकर थोड़ा पानी पीने से स्वप्न दोष की बीमारी से छुटकारा मिलता है। इसी प्रकार यह एक औषधि के रूप में काम आता है।
●शिवलिंग पर प्रतिदिन बिल्वपत्र चढ़ाने से सभी समस्याएं दूर हो जाती हैं। भक्त को जीवन में कभी भी पैसों की कोई समस्या नहीं रहती है।
●शास्त्रों में बताया गया है जिन स्थानों पर बिल्ववृक्ष हैं वह स्थान काशी तीर्थ के समान पूजनीय और पवित्र है। ऐसी जगह जाने पर अक्षय्य पुण्य की प्राप्ति होती है।
●बिल्वपत्र उत्तम वायुनाशक, कफ-निस्सारक व जठराग्निवर्धक है। ये कृमि व दुर्गन्ध का नाश करते हैं। इनमें निहित उड़नशील तैल व इगेलिन, इगेलेनिन नामक क्षार-तत्त्व आदि औषधीय गुणों से भरपूर हैं। चतुर्मास में उत्पन्न होने वाले रोगों का प्रतिकार करने की क्षमता बिल्वपत्र में है।
●ध्यान रखें इन कुछ तिथियों पर बिल्वपत्र नहीं तोडना चाहिए। ये तिथियां हैं चतुर्थी, अष्टमी, नवमी, द्वादशी, चतुर्दशी, अमावस्या, पूर्णिमा, संक्रान्ति और सोमवार तथा प्रतिदिन दोपहर के बाद बिल्वपत्र नहीं तोडना चाहिए। ऐसा करने पर पत्तियां तोडऩे वाला व्यक्ति पाप का भागी बनता है।
●शास्त्रों के अनुसार बिल्व का वृक्ष उत्तर-पश्चिम में हो तो यश बढ़ता है, उत्तर दक्षिण में हो तो सुख शांति बढ़ती है और मध्य में हो तो मधुर जीवन बनता है।
●घर में बिल्ववृक्ष लगाने से परिवार के सभी सदस्य कई प्रकार के पापों के प्रभाव से मुक्त हो जाते हैं। इस वृक्ष के प्रभाव से सभी सदस्य यशस्वी होते हैं, समाज में मान-सम्मान मिलता है। ऐसा शास्त्रों में वर्णित है।
●बिल्ववृक्ष के नीचे शिवलिंग पूजा से सभी मनोकामना पूरी होती है।
●बिल्व की जड़ का जल सिर पर लगाने से सभी तीर्थों की यात्रा का पुण्य मिल जाता है।
●गंध, फूल, धतूरे से जो बिल्ववृक्ष के जड़ की पूजा करता है, उसे संतान और सभी सुख मिल जाते हैं।
●बिल्ववृक्ष की बिल्वपत्रों से पूजा करने पर सभी पापों से मुक्ति मिल जाती हैं।
●जो बिल्व की जड़ के पास किसी शिव भक्त को घी सहित अन्न या खीर दान देता है, वह कभी भी धनहीन या दरिद्र नहीं होता। क्योंकि यह श्रीवृक्ष भी पुकारा जाता है। यानी इसमें देवी लक्ष्मी का भी वास होता है।

बिल्वाष्टक स्तोत्रम्

त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम्।
त्रिजन्मपापसंहार बिल्वपत्रं शिवार्पणम्॥१॥
त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च ह्यच्छिद्रै: कोमलै: शुभै:।
शिवपूजां करिष्यामि बिल्वपत्रं शिवार्पणम्॥२॥
अखण्डबिल्वपत्रेण पूजिते नन्दिकेश्वरे ।
शुद्ध्यन्ति सर्वपापेभ्यो बिल्वपत्रं शिवार्पणम् ॥३॥
शालग्रामशिलामेकां विप्राणां जातु अर्पयेत् ।
सोमयज्ञ महापुण्यं बिल्वपत्रं शिवार्पणम् ॥४॥
दन्तिकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च ।
कोटिकन्यामहादानं बिल्वपत्रं शिवार्पणम् ॥५॥
लक्ष्म्या: स्तनत उत्पन्नं महादेवस्य च प्रियम्।
बिल्ववृक्षं प्रयच्छामि बिल्वपत्रं शिवार्पणम् ॥६॥
दर्शनं बिल्ववृक्षस्य स्पर्शनं पापनाशनम् ।
अघोरपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणम् ॥७॥
मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे ।
अग्रत: शिवरूपाय बिल्वपत्रं शिवार्पणम् ॥८॥
बिल्वाष्टकमिदं पुण्यं य: पठेच्छिवसन्निधौ ।
सर्वपापविनिर्मुक्त: शिवलोकमवाप्नुयात्   ॥९॥

शिवाला बेल वहाण्यामागील शास्त्र

१. बेल: वैशिष्ट्ये

त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रयायुधम् । त्रिजन्मपापसंहारं एकबिल्वं शिवार्पणम् ।। - बिल्वाष्टक,
अर्थ : तीन पाने असलेले, त्रिगुणाप्रमाणे असलेले, तीन डोळ्यांप्रमाणे असणारे, तीन आयुधे असल्याप्रमाणे असणारे आणि तीन जन्मांची पापे नष्ट करणारे असे हे बिल्वदल मी शंकराला अर्पण करतो.

२. शिवाला त्रिदल बेल वहाण्यामागील मानसशास्त्रीय कारणे

अ. त्रिगुणातीत होण्यासाठी साहाय्यभूत ठरणे
‘सत्त्व, रज आणि तम यांमुळे उत्पत्ती, स्थिती अन् लय उत्पन्न होतात. कौमार्य, यौवन आणि जरा या अवस्थांचे प्रतीक म्हणून शंकराला बिल्वपत्र वहावे, म्हणजे या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जाण्याची इच्छा प्रगट करावी; कारण त्रिगुणातीत झाल्याने ईश्वर भेटतो.’

आ. बेल आणि दूर्वा यांच्याप्रमाणे गुणातीत अवस्थेतून गुणाला घेऊन कार्य केल्यास, ते कार्य करूनही अलिप्त रहाता येणे
‘शिवाला त्रिदल बेल आवडतो, म्हणजे जो आपले सत्त्व, रज आणि तम हे तीनही गुण शिवाला अर्पण करून समर्पण बुद्धीने भगवत्कार्य करतो, त्याच्यावर शिव संतुष्ट होतो. श्री गणेशसुद्धा त्रिदल दूर्वा स्वीकारतो. बेल आणि दूर्वा हे गुणातीत अवस्थेत राहून गुणाद्वारे भगवत्कार्य करतात; म्हणूनच ते भक्तांना म्हणतात, ‘तुम्हीसुद्धा गुणातीत होऊन भक्तीभावाने कार्य करा. गुणातीत अवस्थेतून गुणाला घेऊन कार्य केल्यास, ते कार्य करूनही अलिप्त रहाल.

विवरण: सर्वसाधारण व्यक्तीला ईश्वराच्या निर्गुण, निराकार रूपाची उपासना करणे कठीण असते. बेल आणि दूर्वा यांसारख्या गुणातीत अवस्थेत राहून कार्य करणार्या पत्रींच्या साहाय्याने सगुण भक्ती करत, भक्ताला सगुणातून निर्गुणाकडे जाणे सुलभ होते.

३. शिवाला बेल वहाण्याच्या पद्धतीमागील अध्यात्मशास्त्र

अ. तारक किंवा मारक उपासना-पद्धतीनुसार बेल कसा वहावा ?
बेलाची पाने तारक शिवतत्त्वाची वाहक आहेत, तर बेलाच्या पानाचे देठ मारक शिवतत्त्वाचे वाहक आहे. 

अ १. शिवाच्या तारक रूपाची उपासना करणारे सर्वसामान्य उपासकांची प्रकृती तारक स्वरूपाची असल्याने शिवाची तारक उपासना ही त्यांच्या प्रकृतीला जुळणारी आणि त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीस पूरक ठरणारी असते. अशांनी शिवाच्या तारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून बेलपत्र वहावे (बिल्वं तु न्युब्जं स्वाभिमुखाग्रं च ।). 

अ २. शिवाच्या मारक रूपाची उपासना करणारे शक्तिपंथीय शिवाच्या मारक रूपाची उपासना करतात. 

अ. अशा उपासकांनी शिवाच्या मारक तत्त्वाचा लाभ होण्यासाठी बेलाच्या पानाचे अग्र देवाकडे आणि देठ आपल्याकडे करून बेलपत्र वहावे. आ. पिंडीत आहत (पिंडीवर पडणारे पाणी आपटल्याने निर्माण होणार्या) नादातील ± अनाहत (सूक्ष्म) नादातील, अशी दोन प्रकारची पवित्रके असतात. ही दोन पवित्रके अधिक वाहिलेल्या बिल्वदलातील पवित्रके, अशी तीन पवित्रके खेचून घेण्यासाठी तीन पाने असलेला बेल शिवाला वहावा. कोवळे बिल्वपत्र आहत (नादभाषा) आणि अनाहत (प्रकाशभाषा) ध्वनी एक करूशकते. वाहतांना बिल्वपत्र पिंडीवर उपडे ठेवून देठ आपल्याकडे ठेवावा. तीन पानांतून एकत्र येणारी शक्ती आपल्याकडे यावी, हा त्यात उद्देश असतो. या तीन पवित्रकांच्या एकत्रित शक्तीने त्रिगुण न्यून (कमी) होण्यास साहाय्य होते.

आ. बेल वहाण्याच्या पद्धतीनुसार व्यष्टी आणि समष्टी स्तरावर होणारा शिवत्त्वाचा लाभ बेलाच्या पानाचे देठ पिंडीकडे आणि अग्र (टोक) आपल्याकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वहातो, तेव्हा बेलपत्राच्या अग्रावाटे शिवाचे तत्त्व वातावरणात पसरण्याचे प्रमाण अधिक असते. या पद्धतीमुळे समष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो. याउलट बेलाच्या पानाचे देठ आपल्याकडे आणि अग्र (टोक) पिंडीकडे करून जेव्हा आपण बेलपत्र वाहतो, तेव्हा देठाच्या माध्यमातून शिवतत्त्व केवळ बेलपत्र वाहणार्यालाच मिळते. या पद्धतीमुळे व्यष्टी स्तरावर शिवतत्त्वाचा लाभ होतो.

इ. बेल उपडा वहाण्यामागील कारण बेलाचे पान शिवपिंडीवर उपडे वाहिल्यावर त्यातून निर्गुण स्तरावरील स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. त्यामुळे बेलाच्या पानाचा भाविकाला अधिक लाभ होतो. शिवाला बेल ताजा न मिळाल्यास शिळा चालतो; परंतु सोमवारचा बेल दुसर्या दिवशी चालत नाही.

४. बेलाचे आरोग्यदृष्ट्या असलेले लाभ

अ. आयुर्वेदातील कायाकल्पात त्रिदलरससेवनाला महत्त्व दिले आहे. 

आ. बेलफळाला आयुर्वेदात अमृतफळ म्हणतात. बेलाने बरा होत नाही, असा कोणताही रोग नाही. कोणतेही औषध न मिळाल्यास बेलाचा वापर करावा; मात्र गरोदर स्त्रीला बेल देऊ नये; कारण त्याने अर्भक मरण पावण्याची शक्यता असते.

शिव अभिषेक व पूजा में प्रयुक्त द्रव्य विशेष के फल 

मधु- सिद्धि प्रद
दुग्ध से- समृद्धि दायक 
कुषा जल- रोग नाशक 
ईख रस- मंगल कारक 
गंगा जल- सर्व सिद्धि दायक 
ऋतू फल के रस- धन लाभ 

शिव उपासना
शिव उपासना

शिव आराधना के मंत्र व अनुष्ठान

|| नमोस्तुते शंकरशांतिमूर्ति | नमोस्तुते चन्द्रकलावत्स ||
|| नमोस्तुते कारण कारणाय | नमोस्तुते कर्भ वर्जिताय ||

अथवा 

|| ॐ नमस्तुते देवेशाय नमस्कृताय भूत भव्य महादेवाय हरित पिंगल लोचनाय ||

अथवा 

|| ॐ नमो भगवते रुद्राय नमः ||

अथवा 

|| ॐ दक्षिणा मूर्ति शिवाय नमः ||

अथवा 

|| ॐ दारिद्र्य दुःख दहनाय नम: शिवाय ||

अथवा 

|| वृषवाहनः शिव शंकराय नमो नमः | ओजस्तेजो सर्वशासकः शिव शंकराय नमो नमः ||          

शिव सहस्त्रनाम

ॐ स्थिराय नमः॥ॐ स्थाणवे नमः॥ॐ प्रभवे नमः॥ॐ भीमाय नमः॥ॐ प्रवराय नमः॥ॐ वरदाय नमः॥ॐ वराय नमः॥ॐ सर्वात्मन नमः॥ ॐ सर्वविख्याताय नमः॥ ॐ सर्वस्मै नमः॥ ॐ सर्वकाराय नमः॥ॐ भवाय नमः॥ॐ जटिने नमः॥ॐ चर्मिणे नमः॥ ॐ शिखण्डिने नमः॥ ॐ सर्वांङ्गाय नमः॥ ॐ सर्वभावाय नमः॥ ॐ हराय नमः॥ ॐ हरिणाक्षाय नमः॥ ॐ सर्वभूतहराय नमः॥ ॐ प्रभवे नमः॥ ॐ प्रवृत्तये नमः॥ ॐ निवृत्तये नमः॥ ॐ नियताय नमः॥ ॐ शाश्वताय नमः॥ ॐ ध्रुवाय नमः॥ ॐ श्मशानवासिने नमः॥ ॐ भगवते नमः॥ ॐ खेचराय नमः॥ ॐ गोचराय नमः॥ ॐ अर्दनाय नमः॥ ॐ अभिवाद्याय नमः॥ ॐ महाकर्मणे नमः॥ ॐ तपस्विने नमः॥ ॐ भूतभावनाय नमः॥ ॐ उन्मत्तवेषप्रच्छन्नाय नमः॥ ॐ सर्वलोकप्रजापतये नमः॥ ॐ महारूपाय नमः॥ ॐ महाकायाय नमः॥ ॐ वृषरूपाय नमः॥ ॐ महायशसे नमः॥ ॐ महात्मने नमः॥ ॐ सर्वभूतात्मने नमः॥ ॐ विश्वरूपाय नमः॥ ॐ महाहनवे नमः॥ ॐ लोकपालाय नमः॥ ॐ अंतर्हितात्मने नमः॥ ॐ प्रसादाय नमः॥ ॐ हयगर्दभाय नमः॥ ॐ पवित्राय नमः॥ (५०)

ॐ महते नमः॥ ॐ नियमाय नमः॥ ॐ नियमाश्रिताय नमः॥ ॐ सर्वकर्मणे नमः॥ ॐ स्वयंभूताय नमः॥ ॐ आदये नमः॥ ॐ आदिकराय नमः॥ ॐ निधये नमः॥ ॐ सहस्राक्षाय नमः॥ ॐ विशालाक्षाय नमः॥ ॐ सोमाय नमः॥ ॐ नक्षत्रसाधकाय नमः॥ ॐ चंद्राय नमः॥ ॐ सूर्याय नमः॥ ॐ शनये नमः॥ ॐ केतवे नमः॥ ॐ ग्रहाय नमः॥ ॐ ग्रहपतये नमः॥ ॐ वराय नमः॥ ॐ अत्रये नमः॥ ॐ अत्र्यानमस्कर्त्रे नमः॥ ॐ मृगबाणार्पणाय नमः॥ ॐ अनघाय नमः॥ ॐ महातपसे नमः॥ ॐ घोरतपसे नमः॥ ॐ अदीनाय नमः॥ ॐ दीनसाधककराय नमः॥ ॐ संवत्सरकराय नमः॥ ॐ मंत्राय नमः॥ ॐ प्रमाणाय नमः॥ ॐ परमन्तपाय नमः॥ ॐ योगिने नमः॥ ॐ योज्याय नमः॥ ॐ महाबीजाय नमः॥ ॐ महारेतसे नमः॥ ॐ महाबलाय नमः॥ ॐ सुवर्णरेतसे नमः॥ ॐ सर्वज्ञाय नमः॥ ॐ सुबीजाय नमः॥ ॐ बीजवाहनाय नमः॥ ॐ दशबाहवे नमः॥ ॐ अनिमिषाय नमः॥ ॐ नीलकण्ठाय नमः॥ ॐ उमापतये नमः॥ ॐ विश्वरूपाय नमः॥ ॐ स्वयंश्रेष्ठाय नमः॥ ॐ बलवीराय नमः॥ ॐ अबलोगणाय नमः॥ ॐ गणकर्त्रे नमः॥ ॐ गणपतये नमः॥ (१००)

ॐ दिग्वाससे नमः॥ ॐ कामाय नमः॥ ॐ मंत्रविदे नमः॥ ॐ परममन्त्राय नमः॥ ॐ सर्वभावकराय नमः॥ ॐ हराय नमः॥ ॐ *कमण्डलुधराय नमः॥ ॐ धन्विते नमः॥ ॐ बाणहस्ताय नमः॥ ॐ कपालवते नमः॥ ॐ अशनिने नमः॥ ॐ शतघ्निने नमः॥ ॐ खड्गिने नमः॥ ॐ पट्टिशिने नमः॥ ॐ *आयुधिने नमः॥ ॐ महते नमः॥ ॐ स्रुवहस्ताय नमः॥ ॐ सुरूपाय नमः॥ ॐ तेजसे नमः॥ ॐ तेजस्करनिधये नमः॥ ॐ उष्णीषिणे नमः॥ ॐ *सुवक्त्राय नमः॥ ॐ उदग्राय नमः॥ ॐ विनताय नमः॥ ॐ दीर्घाय नमः॥ ॐ हरिकेशाय नमः॥ ॐ सुतीर्थाय नमः॥ ॐ कृष्णाय नमः॥ ॐ श्रृगालरूपाय नमः॥ ॐ सिद्धार्थाय नमः॥
ॐ मुण्डाय नमः॥ ॐ सर्वशुभंकराय नमः॥ ॐ अजाय नमः॥ ॐ बहुरूपाय नमः॥ ॐ गन्धधारिणे नमः॥ ॐ कपर्दिने नमः॥ ॐ उर्ध्वरेतसे नमः॥ ॐ उर्ध्वलिंगाय नमः॥ ॐ उर्ध्वशायिने नमः॥ ॐ नभस्थलाय नमः॥ ॐ *त्रिजटाय नमः॥ ॐ चीरवाससे नमः॥ ॐ रूद्राय नमः॥ ॐ सेनापतये नमः॥ ॐ विभवे नमः॥ ॐ अहश्चराय नमः॥ ॐ नक्तंचराय नमः॥ ॐ तिग्ममन्यवे नमः॥ ॐ सुवर्चसाय नमः॥ ॐ गजघ्ने नमः॥ (१५०)

ॐ दैत्यघ्ने नमः॥ ॐ कालाय नमः॥ ॐ लोकधात्रे नमः॥ ॐ गुणाकराय नमः॥ ॐ सिंहसार्दूलरूपाय नमः॥ ॐ आर्द्रचर्माम्बराय नमः॥ ॐ कालयोगिने नमः॥ ॐ महानादाय नमः॥ ॐ सर्वकामाय नमः॥ ॐ चतुष्पथाय नमः॥ ॐ निशाचराय नमः॥ ॐ प्रेतचारिणे नमः॥ ॐ भूतचारिणे नमः॥ ॐ महेश्वराय नमः॥ ॐ बहुभूताय नमः॥ ॐ बहुधराय नमः॥ ॐ स्वर्भानवे नमः॥ ॐ अमिताय नमः॥ ॐ गतये नमः॥ ॐ नृत्यप्रियाय नमः॥ ॐ नृत्यनर्ताय नमः॥ ॐ नर्तकाय नमः॥ ॐ सर्वलालसाय नमः॥ ॐ घोराय नमः॥ ॐ महातपसे नमः॥ ॐ पाशाय नमः॥ ॐ नित्याय नमः॥ ॐ गिरिरूहाय नमः॥ ॐ नभसे नमः॥ ॐ सहस्रहस्ताय नमः॥ ॐ विजयाय नमः॥ ॐ व्यवसायाय नमः॥ ॐ अतन्द्रियाय नमः॥ ॐ अधर्षणाय नमः॥ ॐ धर्षणात्मने नमः॥ ॐ यज्ञघ्ने नमः॥ ॐ कामनाशकाय नमः॥ ॐ दक्षयागापहारिणे नमः॥ ॐ सुसहाय नमः॥ ॐ मध्यमाय नमः॥ ॐ तेजोपहारिणे नमः॥ ॐ बलघ्ने नमः॥ ॐ मुदिताय नमः॥ ॐ अर्थाय नमः॥ ॐ अजिताय नमः॥ ॐ अवराय नमः॥ ॐ गम्भीरघोषाय नमः॥ ॐ गम्भीराय नमः॥ ॐ गंभीरबलवाहनाय नमः॥ ॐ न्यग्रोधरूपाय नमः॥ (२००)

ॐ न्यग्रोधाय नमः॥ ॐ वृक्षकर्णस्थितये नमः॥ ॐ विभवे नमः॥ ॐ सुतीक्ष्णदशनाय नमः॥ ॐ महाकायाय नमः॥ ॐ महाननाय नमः॥ ॐ विश्वकसेनाय नमः॥ ॐ हरये नमः॥ ॐ यज्ञाय नमः॥ ॐ संयुगापीडवाहनाय नमः॥ ॐ तीक्ष्णतापाय नमः॥ ॐ हर्यश्वाय नमः॥ ॐ सहायाय नमः॥ ॐ कर्मकालविदे नमः॥ ॐ विष्णुप्रसादिताय नमः॥ ॐ यज्ञाय नमः॥ ॐ समुद्राय नमः॥ ॐ वडमुखाय नमः॥ ॐ हुताशनसहायाय नमः॥ ॐ प्रशान्तात्मने नमः॥ ॐ हुताशनाय नमः॥ ॐ उग्रतेजसे नमः॥ ॐ महातेजसे नमः॥ ॐ जन्याय नमः॥ ॐ विजयकालविदे नमः॥ ॐ ज्योतिषामयनाय नमः॥ ॐ सिद्धये नमः॥ ॐ सर्वविग्रहाय नमः॥ ॐ शिखिने नमः॥ ॐ मुण्डिने नमः॥ ॐ जटिने नमः॥ ॐ ज्वालिने नमः॥ ॐ मूर्तिजाय नमः॥ ॐ मूर्ध्दगाय नमः॥ ॐ बलिने नमः॥ ॐ वेणविने नमः॥ ॐ पणविने नमः॥ ॐ तालिने नमः॥ ॐ खलिने नमः॥ ॐ कालकंटकाय नमः॥ ॐ नक्षत्रविग्रहमतये नमः॥ ॐ गुणबुद्धये नमः॥ ॐ लयाय नमः॥ ॐ अगमाय नमः॥ ॐ प्रजापतये नमः॥ ॐ विश्वबाहवे नमः॥ ॐ विभागाय नमः॥ ॐ सर्वगाय नमः॥ ॐ अमुखाय नमः॥ ॐ विमोचनाय नमः॥ (२५०)

ॐ सुसरणाय नमः॥ ॐ हिरण्यकवचोद्भाय नमः॥ ॐ मेढ्रजाय नमः॥ ॐ बलचारिणे नमः॥ ॐ महीचारिणे नमः॥ ॐ स्रुत्याय नमः॥ ॐ सर्वतूर्यनिनादिने नमः॥ ॐ सर्वतोद्यपरिग्रहाय नमः॥ ॐ व्यालरूपाय नमः॥ ॐ गुहावासिने नमः॥ ॐ गुहाय नमः॥ ॐ मालिने नमः॥ ॐ तरंगविदे नमः॥ ॐ त्रिदशाय नमः॥ ॐ त्रिकालधृगे नमः॥ ॐ कर्मसर्वबन्ध–विमोचनाय नमः॥ ॐ असुरेन्द्राणां बन्धनाय नमः॥ ॐ युधि शत्रुवानाशिने नमः॥ ॐ सांख्यप्रसादाय नमः॥ ॐ दुर्वाससे नमः॥ ॐ सर्वसाधुनिषेविताय नमः॥ ॐ प्रस्कन्दनाय नमः॥ ॐ विभागज्ञाय नमः॥ ॐ अतुल्याय नमः॥ ॐ यज्ञविभागविदे नमः॥ ॐ सर्वचारिणे नमः॥ ॐ सर्ववासाय नमः॥ ॐ दुर्वाससे नमः॥ ॐ वासवाय नमः॥ ॐ अमराय नमः॥ ॐ हैमाय नमः॥ ॐ हेमकराय नमः॥ ॐ अयज्ञसर्वधारिणे नमः॥ ॐ धरोत्तमाय नमः॥ ॐ लोहिताक्षाय नमः॥ ॐ महाक्षाय नमः॥ ॐ विजयाक्षाय नमः॥ ॐ विशारदाय नमः॥ ॐ संग्रहाय नमः॥ ॐ निग्रहाय नमः॥ ॐ कर्त्रे नमः॥ ॐ सर्पचीरनिवसनाय नमः॥ ॐ मुख्याय नमः॥ ॐ अमुख्याय नमः॥ ॐ देहाय नमः॥ ॐ काहलये नमः॥ ॐ सर्वकामदाय नमः॥ ॐ सर्वकालप्रसादाय नमः॥ ॐ सुबलाय नमः॥ ॐ बलरूपधृगे नमः॥ (३००)

ॐ सर्वकामवराय नमः॥ ॐ सर्वदाय नमः॥ ॐ सर्वतोमुखाय नमः॥ ॐ आकाशनिर्विरूपाय नमः॥ ॐ निपातिने नमः॥ ॐ अवशाय नमः॥ ॐ खगाय नमः॥ ॐ रौद्ररूपाय नमः॥ ॐ अंशवे नमः॥ ॐ आदित्याय नमः॥ ॐ बहुरश्मये नमः॥ ॐ सुवर्चसिने नमः॥ ॐ वसुवेगाय नमः॥ ॐ महावेगाय नमः॥ ॐ मनोवेगाय नमः॥ ॐ निशाचराय नमः॥ ॐ सर्ववासिने नमः॥ ॐ श्रियावासिने नमः॥ ॐ उपदेशकराय नमः॥ ॐ अकराय नमः॥ ॐ मुनये नमः॥ ॐ आत्मनिरालोकाय नमः॥ ॐ संभग्नाय नमः॥ ॐ सहस्रदाय नमः॥ ॐ पक्षिणे नमः॥ ॐ पक्षरूपाय नमः॥ ॐ अतिदीप्ताय नमः॥ ॐ विशाम्पतये नमः॥ ॐ उन्मादाय नमः॥ ॐ मदनाय नमः॥ ॐ कामाय नमः॥ ॐ अश्वत्थाय नमः॥ ॐ अर्थकराय नमः॥ ॐ यशसे नमः॥ ॐ वामदेवाय नमः॥ ॐ वामाय नमः॥ ॐ प्राचे नमः॥ ॐ दक्षिणाय नमः॥ ॐ वामनाय नमः॥ ॐ सिद्धयोगिने नमः॥ ॐ महर्षये नमः॥ ॐ सिद्धार्थाय नमः॥ ॐ सिद्धसाधकाय नमः॥ ॐ भिक्षवे नमः॥ ॐ भिक्षुरूपाय नमः॥ ॐ विपणाय नमः॥ ॐ मृदवे नमः॥ ॐ अव्ययाय नमः॥ ॐ महासेनाय नमः॥ ॐ विशाखाय नमः॥ (३५०)

ॐ षष्टिभागाय नमः॥ ॐ गवाम्पतये नमः॥ ॐ वज्रहस्ताय नमः॥ ॐ विष्कम्भिने नमः॥ ॐ चमुस्तंभनाय नमः॥ ॐ वृत्तावृत्तकराय नमः॥ ॐ तालाय नमः॥ ॐ मधवे नमः॥ ॐ मधुकलोचनाय नमः॥ ॐ वाचस्पतये नमः॥ ॐ वाजसनाय नमः॥ ॐ नित्यमाश्रमपूजिताय नमः॥ ॐ ब्रह्मचारिणे नमः॥ ॐ लोकचारिणे नमः॥ ॐ सर्वचारिणे नमः॥ ॐ विचारविदे नमः॥ ॐ ईशानाय नमः॥ ॐ ईश्वराय नमः॥ ॐ कालाय नमः॥ ॐ निशाचारिणे नमः॥ ॐ पिनाकधृगे नमः॥ ॐ निमितस्थाय नमः॥ ॐ निमित्ताय नमः॥ ॐ नन्दये नमः॥ ॐ नन्दिकराय नमः॥ ॐ हरये नमः॥ ॐ नन्दीश्वराय नमः॥ ॐ नन्दिने नमः॥ ॐ नन्दनाय नमः॥ ॐ नंन्दीवर्धनाय नमः॥ ॐ भगहारिणे नमः॥ ॐ निहन्त्रे नमः॥ ॐ कालाय नमः॥ ॐ ब्रह्मणे नमः॥ ॐ पितामहाय नमः॥ ॐ चतुर्मुखाय नमः॥ ॐ महालिंगाय नमः॥ ॐ चारूलिंगाय नमः॥ ॐ लिंगाध्यक्षाय नमः॥ ॐ सुराध्यक्षाय नमः॥ ॐ योगाध्यक्षाय नमः॥ ॐ युगावहाय नमः॥ ॐ बीजाध्यक्षाय नमः॥ ॐ बीजकर्त्रे नमः॥ ॐ अध्यात्मानुगताय नमः॥ ॐ बलाय नमः॥ ॐ इतिहासाय नमः॥ ॐ सकल्पाय नमः॥ ॐ गौतमाय नमः॥ ॐ निशाकराय नमः॥ (४००)

ॐ दम्भाय नमः॥ ॐ अदम्भाय नमः॥ ॐ वैदम्भाय नमः॥ ॐ वश्याय नमः॥ ॐ वशकराय नमः॥ ॐ कलये नमः॥ ॐ लोककर्त्रे नमः॥ ॐ पशुपतये नमः॥ ॐ महाकर्त्रे नमः॥ ॐ अनौषधाय नमः॥ ॐ अक्षराय नमः॥ ॐ परब्रह्मणे नमः॥ ॐ बलवते नमः॥ ॐ शक्राय नमः॥ ॐ नीतये नमः॥ ॐ अनीतये नमः॥ ॐ शुद्धात्मने नमः॥ ॐ मान्याय नमः॥ ॐ शुद्धाय नमः॥ ॐ गतागताय नमः॥ ॐ बहुप्रसादाय नमः॥ ॐ सुस्पप्नाय नमः॥ ॐ दर्पणाय नमः॥ ॐ अमित्रजिते नमः॥ ॐ वेदकराय नमः॥ ॐ मंत्रकराय नमः॥ ॐ विदुषे नमः॥ ॐ समरमर्दनाय नमः॥ ॐ महामेघनिवासिने नमः॥ ॐ महाघोराय नमः॥ ॐ वशिने नमः॥ ॐ कराय नमः॥ ॐ अग्निज्वालाय नमः॥ ॐ महाज्वालाय नमः॥ ॐ अतिधूम्राय नमः॥ ॐ हुताय नमः॥ ॐ हविषे नमः॥ ॐ वृषणाय नमः॥ ॐ शंकराय नमः॥ ॐ नित्यंवर्चस्विने नमः॥ ॐ धूमकेताय नमः॥ ॐ नीलाय नमः॥ ॐ अंगलुब्धाय नमः॥ ॐ शोभनाय नमः॥ ॐ निरवग्रहाय नमः॥ ॐ स्वस्तिदायकाय नमः॥ ॐ स्वस्तिभावाय नमः॥ ॐ भागिने नमः॥ ॐ भागकराय नमः॥ ॐ लघवे नमः॥(४५०)

ॐ उत्संगाय नमः॥ ॐ महांगाय नमः॥ ॐ महागर्भपरायणाय नमः॥ ॐ कृष्णवर्णाय नमः॥ ॐ सुवर्णाय नमः॥ ॐ सर्वदेहिनामिनिन्द्राय नमः॥ ॐ महापादाय नमः॥ ॐ महाहस्ताय नमः॥ ॐ महाकायाय नमः॥ ॐ महायशसे नमः॥ ॐ महामूर्धने नमः॥ ॐ महामात्राय नमः॥ ॐ महानेत्राय नमः॥ ॐ निशालयाय नमः॥ ॐ महान्तकाय नमः॥ ॐ महाकर्णाय नमः॥ ॐ महोष्ठाय नमः॥ ॐ महाहनवे नमः॥ ॐ महानासाय नमः॥ ॐ महाकम्बवे नमः॥ ॐ महाग्रीवाय नमः॥ ॐ श्मशानभाजे नमः॥ ॐ महावक्षसे नमः॥ ॐ महोरस्काय नमः॥ ॐ अंतरात्मने नमः॥ ॐ मृगालयाय नमः॥ ॐ लंबनाय नमः॥ ॐ लम्बितोष्ठाय नमः॥ ॐ महामायाय नमः॥ ॐ पयोनिधये नमः॥ ॐ महादन्ताय नमः॥ ॐ महाद्रष्टाय नमः॥ ॐ महाजिह्वाय नमः॥ ॐ महामुखाय नमः॥ ॐ महारोम्णे नमः॥ ॐ महाकोशाय नमः॥ ॐ महाजटाय नमः॥ ॐ प्रसन्नाय नमः॥ ॐ प्रसादाय नमः॥ ॐ प्रत्ययाय नमः॥ ॐ गिरिसाधनाय नमः॥ ॐ स्नेहनाय नमः॥ ॐ अस्नेहनाय नमः॥ ॐ अजिताय नमः॥ ॐ महामुनये नमः॥ ॐ वृक्षाकाराय नमः॥ ॐ वृक्षकेतवे नमः॥ ॐ अनलाय नमः॥ ॐ वायुवाहनाय नमः॥ (५००)

ॐ गण्डलिने नमः॥ ॐ मेरूधाम्ने नमः॥ ॐ देवाधिपतये नमः॥ ॐ अथर्वशीर्षाय नमः॥ ॐ सामास्या नमः॥ ॐ ऋक्सहस्रामितेक्षणाय नमः॥ ॐ यजुः॥ पादभुजाय नमः॥ ॐ गुह्याय नमः॥ ॐ प्रकाशाय नमः॥ ॐ जंगमाय नमः॥ ॐ अमोघार्थाय नमः॥ ॐ प्रसादाय नमः॥ ॐ अभिगम्याय नमः॥ ॐ सुदर्शनाय नमः॥ ॐ उपकाराय नमः॥ ॐ प्रियाय नमः॥ ॐ सर्वाय नमः॥ ॐ कनकाय नमः॥ ॐ काञ्चनवच्छये नमः॥ ॐ नाभये नमः॥ ॐ नन्दिकराय नमः॥ ॐ भावाय नमः॥ ॐ पुष्करथपतये नमः॥ ॐ स्थिराय नमः॥ ॐ द्वादशाय नमः॥ ॐ त्रासनाय नमः॥ ॐ आद्याय नमः॥ ॐ यज्ञाय नमः॥ ॐ यज्ञसमाहिताय नमः॥ ॐ नक्तंस्वरूपाय नमः॥ ॐ कलये नमः॥ ॐ कालाय नमः॥ ॐ मकराय नमः॥ ॐ कालपूजिताय नमः॥ ॐ सगणाय नमः॥ ॐ गणकराय नमः॥ ॐ भूतवाहनसारथये नमः॥ ॐ भस्मशयाय नमः॥ ॐ भस्मगोप्त्रे नमः॥ ॐ भस्मभूताय नमः॥ ॐ तरवे नमः॥ ॐ गणाय नमः॥ ॐ लोकपालाय नमः॥ ॐ आलोकाय नमः॥ ॐ महात्मने नमः॥ ॐ सर्वपूजिताय नमः॥ ॐ शुक्लाय नमः॥ ॐ त्रिशुक्लाय नमः॥ ॐ संपन्नाय नमः॥ ॐ शुचये नमः॥ (५५०)

ॐ भूतनिशेविताय नमः॥ ॐ आश्रमस्थाय नमः॥ ॐ क्रियावस्थाय नमः॥ ॐ विश्वकर्ममतये नमः॥ ॐ वराय नमः॥ ॐ विशालशाखाय नमः॥ ॐ ताम्रोष्ठाय नमः॥ ॐ अम्बुजालाय नमः॥ ॐ सुनिश्चलाय नमः॥ ॐ कपिलाय नमः॥ ॐ कपिशाय नमः॥ ॐ शुक्लाय नमः॥ ॐ आयुषे नमः॥ ॐ पराय नमः॥ ॐ अपराय नमः॥ ॐ गंधर्वाय नमः॥ ॐ अदितये नमः॥ ॐ ताक्ष्याय नमः॥ ॐ सुविज्ञेयाय नमः॥ ॐ सुशारदाय नमः॥ ॐ परश्वधायुधाय नमः॥ ॐ देवाय नमः॥ ॐ अनुकारिणे नमः॥ ॐ सुबान्धवाय नमः॥ ॐ तुम्बवीणाय नमः॥ ॐ महाक्रोधाय नमः॥ ॐ ऊर्ध्वरेतसे नमः॥ ॐ जलेशयाय नमः॥ ॐ उग्राय नमः॥ ॐ वंशकराय नमः॥ ॐ वंशाय नमः॥ ॐ वंशानादाय नमः॥ ॐ अनिन्दिताय नमः॥ ॐ सर्वांगरूपाय नमः॥ ॐ मायाविने नमः॥ ॐ सुहृदे नमः॥ ॐ अनिलाय नमः॥ ॐ अनलाय नमः॥ ॐ बन्धनाय नमः॥ ॐ बन्धकर्त्रे नमः॥ ॐ सुवन्धनविमोचनाय नमः॥ ॐ सयज्ञयारये नमः॥ ॐ सकामारये नमः॥ ॐ महाद्रष्टाय नमः॥ ॐ महायुधाय नमः॥ ॐ बहुधानिन्दिताय नमः॥ ॐ शर्वाय नमः॥ ॐ शंकराय नमः॥ ॐ शं कराय नमः॥ ॐ अधनाय नमः॥ (६००)

ॐ अमरेशाय नमः॥ ॐ महादेवाय नमः॥ ॐ विश्वदेवाय नमः॥ ॐ सुरारिघ्ने नमः॥ ॐ अहिर्बुद्धिन्याय नमः॥ ॐ अनिलाभाय नमः॥ ॐ चेकितानाय नमः॥ ॐ हविषे नमः॥ ॐ अजैकपादे नमः॥ ॐ कापालिने नमः॥ ॐ त्रिशंकवे नमः॥ ॐ अजिताय नमः॥ ॐ शिवाय नमः॥ ॐ धन्वन्तरये नमः॥ ॐ धूमकेतवे नमः॥ ॐ स्कन्दाय नमः॥ ॐ वैश्रवणाय नमः॥ ॐ धात्रे नमः॥ ॐ शक्राय नमः॥ ॐ विष्णवे नमः॥ ॐ मित्राय नमः॥ ॐ त्वष्ट्रे नमः॥ ॐ ध्रुवाय नमः॥ ॐ धराय नमः॥ ॐ प्रभावाय नमः॥ ॐ सर्वगोवायवे नमः॥ ॐ अर्यम्णे नमः॥ ॐ सवित्रे नमः॥ ॐ रवये नमः॥ ॐ उषंगवे नमः॥ ॐ विधात्रे नमः॥ ॐ मानधात्रे नमः॥ ॐ भूतवाहनाय नमः॥ ॐ विभवे नमः॥ ॐ वर्णविभाविने नमः॥ ॐ सर्वकामगुणवाहनाय नमः॥ ॐ पद्मनाभाय नमः॥ ॐ महागर्भाय नमः॥ चन्द्रवक्त्राय नमः॥ ॐ अनिलाय नमः॥ ॐ अनलाय नमः॥ ॐ बलवते नमः॥ ॐ उपशान्ताय नमः॥ ॐ पुराणाय नमः॥ ॐ पुण्यचञ्चवे नमः॥ ॐ ईरूपाय नमः॥ ॐ कुरूकर्त्रे नमः॥ ॐ कुरूवासिने नमः॥ ॐ कुरूभूताय नमः॥ ॐ गुणौषधाय नमः॥ (६५०)

ॐ सर्वाशयाय नमः॥ ॐ दर्भचारिणे नमः॥ ॐ सर्वप्राणिपतये नमः॥ ॐ देवदेवाय नमः॥ ॐ सुखासक्ताय नमः॥ ॐ सत स्वरूपाय नमः॥ ॐ असत् रूपाय नमः॥ ॐ सर्वरत्नविदे नमः॥ ॐ कैलाशगिरिवासने नमः॥ ॐ हिमवद्गिरिसंश्रयाय नमः॥ ॐ कूलहारिणे नमः॥ ॐ कुलकर्त्रे नमः॥ ॐ बहुविद्याय नमः॥ ॐ बहुप्रदाय नमः॥ ॐ वणिजाय नमः॥ ॐ वर्धकिने नमः॥ ॐ वृक्षाय नमः॥ ॐ बकुलाय नमः॥ ॐ चंदनाय नमः॥ ॐ छदाय नमः॥ ॐ सारग्रीवाय नमः॥ ॐ महाजत्रवे नमः॥ ॐ अलोलाय नमः॥ ॐ महौषधाय नमः॥ ॐ सिद्धार्थकारिणे नमः॥ ॐ छन्दोव्याकरणोत्तर-सिद्धार्थाय नमः॥ ॐ सिंहनादाय नमः॥ ॐ सिंहद्रंष्टाय नमः॥ ॐ सिंहगाय नमः॥ ॐ सिंहवाहनाय नमः॥ ॐ प्रभावात्मने नमः॥ ॐ जगतकालस्थालाय नमः॥ ॐ लोकहिताय नमः॥ ॐ तरवे नमः॥ ॐ सारंगाय नमः॥ ॐ नवचक्रांगाय नमः॥ ॐ केतुमालिने नमः॥ ॐ सभावनाय नमः॥ ॐ भूतालयाय नमः॥ ॐ भूतपतये नमः॥ ॐ अहोरात्राय नमः॥ ॐ अनिन्दिताय नमः॥ ॐ सर्वभूतवाहित्रे नमः॥ ॐ सर्वभूतनिलयाय नमः॥ ॐ विभवे नमः॥ ॐ भवाय नमः॥ ॐ अमोघाय नमः॥ ॐ संयताय नमः॥ ॐ अश्वाय नमः॥ ॐ भोजनाय नमः॥(७००)

ॐ प्राणधारणाय नमः॥ ॐ धृतिमते नमः॥ ॐ मतिमते नमः॥ ॐ दक्षाय नमः॥ ॐ सत्कृयाय नमः॥ ॐ युगाधिपाय नमः॥ ॐ गोपाल्यै नमः॥ ॐ गोपतये नमः॥ ॐ ग्रामाय नमः॥ ॐ गोचर्मवसनाय नमः॥ ॐ हरये नमः॥ ॐ हिरण्यबाहवे नमः॥ ॐ प्रवेशिनांगुहापालाय नमः॥ ॐ प्रकृष्टारये नमः॥ ॐ महाहर्षाय नमः॥ ॐ जितकामाय नमः॥ ॐ जितेन्द्रियाय नमः॥ ॐ गांधाराय नमः॥ ॐ सुवासाय नमः॥ ॐ तपः॥सक्ताय नमः॥ ॐ रतये नमः॥ ॐ नराय नमः॥ ॐ महागीताय नमः॥ ॐ महानृत्याय नमः॥ ॐ अप्सरोगणसेविताय नमः॥ ॐ महाकेतवे नमः॥ ॐ महाधातवे नमः॥ ॐ नैकसानुचराय नमः॥ ॐ चलाय नमः॥ ॐ आवेदनीयाय नमः॥ ॐ आदेशाय नमः॥ ॐ सर्वगंधसुखावहाय नमः॥ ॐ तोरणाय नमः॥ ॐ तारणाय नमः॥ ॐ वाताय नमः॥ ॐ परिधये नमः॥ ॐ पतिखेचराय नमः॥ ॐ संयोगवर्धनाय नमः॥ ॐ वृद्धाय नमः॥ ॐ गुणाधिकाय नमः॥ ॐ अतिवृद्धाय नमः॥ ॐ नित्यात्मसहायाय नमः॥ ॐ देवासुरपतये नमः॥ ॐ पत्ये नमः॥ ॐ युक्ताय नमः॥ ॐ युक्तबाहवे नमः॥ ॐ दिविसुपर्वदेवाय नमः॥ ॐ आषाढाय नमः॥ ॐ सुषाढ़ाय नमः॥ ॐ ध्रुवाय नमः॥ (७५०)

ॐ हरिणाय नमः॥ ॐ हराय नमः॥ ॐ आवर्तमानवपुषे नमः॥ ॐ वसुश्रेष्ठाय नमः॥ ॐ महापथाय नमः॥ ॐ विमर्षशिरोहारिणे नमः॥ ॐ सर्वलक्षणलक्षिताय नमः॥ ॐ अक्षरथयोगिने नमः॥ ॐ सर्वयोगिने नमः॥ ॐ महाबलाय नमः॥ ॐ समाम्नायाय नमः॥ ॐ असाम्नायाय नमः॥ ॐ तीर्थदेवाय नमः॥ ॐ महारथाय नमः॥ ॐ निर्जीवाय नमः॥ ॐ जीवनाय नमः॥ ॐ मंत्राय नमः॥ ॐ शुभाक्षाय नमः॥ ॐ बहुकर्कशाय नमः॥ ॐ रत्नप्रभूताय नमः॥ ॐ रत्नांगाय नमः॥ ॐ महार्णवनिपानविदे नमः॥ ॐ मूलाय नमः॥ ॐ विशालाय नमः॥ ॐ अमृताय नमः॥ ॐ व्यक्ताव्यवक्ताय नमः॥ ॐ तपोनिधये नमः॥ ॐ आरोहणाय नमः॥ ॐ अधिरोहाय नमः॥ ॐ शीलधारिणे नमः॥ ॐ महायशसे नमः॥ ॐ सेनाकल्पाय नमः॥ ॐ महाकल्पाय नमः॥ ॐ योगाय नमः॥ ॐ युगकराय नमः॥ ॐ हरये नमः॥ ॐ युगरूपाय नमः॥ ॐ महारूपाय नमः॥ ॐ महानागहतकाय नमः॥ ॐ अवधाय नमः॥ ॐ न्यायनिर्वपणाय नमः॥ ॐ पादाय नमः॥ ॐ पण्डिताय नमः॥ ॐ अचलोपमाय नमः॥ ॐ बहुमालाय नमः॥ ॐ महामालाय नमः॥ ॐ शशिहरसुलोचनाय नमः॥ ॐ विस्तारलवणकूपाय नमः॥ ॐ त्रिगुणाय नमः॥ ॐ सफलोदयाय नमः॥ (८००)

ॐ त्रिलोचनाय नमः॥ ॐ विषण्डागाय नमः॥ ॐ मणिविद्धाय नमः॥ ॐ जटाधराय नमः॥ ॐ बिन्दवे नमः॥ ॐ विसर्गाय नमः॥ ॐ सुमुखाय नमः॥ ॐ शराय नमः॥ ॐ सर्वायुधाय नमः॥ ॐ सहाय नमः॥ ॐ सहाय नमः॥ ॐ निवेदनाय नमः॥ ॐ सुखाजाताय नमः॥ ॐ सुगन्धराय नमः॥ ॐ महाधनुषे नमः॥ ॐ गंधपालिभगवते नमः॥ ॐ सर्वकर्मोत्थानाय नमः॥ ॐ मन्थानबहुलवायवे नमः॥ ॐ सकलाय नमः॥ ॐ सर्वलोचनाय नमः॥ ॐ तलस्तालाय नमः॥ ॐ करस्थालिने नमः॥ ॐ ऊर्ध्वसंहननाय नमः॥ ॐ महते नमः॥ ॐ छात्राय नमः॥ ॐ सुच्छत्राय नमः॥ ॐ विख्यातलोकाय नमः॥ ॐ सर्वाश्रयक्रमाय नमः॥ ॐ मुण्डाय नमः॥ ॐ विरूपाय नमः॥ ॐ विकृताय नमः॥ ॐ दण्डिने नमः॥ ॐ कुदण्डिने नमः॥ ॐ विकुर्वणाय नमः॥ ॐ हर्यक्षाय नमः॥ ॐ ककुभाय नमः॥ ॐ वज्रिणे नमः॥ ॐ शतजिह्वाय नमः॥ ॐ सहस्रपदे नमः॥ ॐ देवेन्द्राय नमः॥ ॐ सर्वदेवमयाय नमः॥ ॐ गुरवे नमः॥ ॐ सहस्रबाहवे नमः॥ ॐ सर्वांगाय नमः॥ ॐ शरण्याय नमः॥ ॐ सर्वलोककृते नमः॥ ॐ पवित्राय नमः॥ ॐ त्रिककुन्मंत्राय नमः॥ ॐ कनिष्ठाय नमः॥ ॐ कृष्णपिंगलाय नमः॥ (८५०)

ॐ ब्रह्मदण्डविनिर्मात्रे नमः॥ ॐ शतघ्नीपाशशक्तिमते नमः॥ ॐ पद्मगर्भाय नमः॥ ॐ महागर्भाय नमः॥ ॐ ब्रह्मगर्भाय नमः॥ ॐ जलोद्भावाय नमः॥ ॐ गभस्तये नमः॥ ॐ ब्रह्मकृते नमः॥ ॐ ब्रह्मिणे नमः॥ ॐ ब्रह्मविदे नमः॥ ॐ ब्राह्मणाय नमः॥ ॐ गतये नमः॥ ॐ अनंतरूपाय नमः॥ ॐ नैकात्मने नमः॥ ॐ स्वयंभुवतिग्मतेजसे नमः॥ ॐ उर्ध्वगात्मने नमः॥ ॐ पशुपतये नमः॥ ॐ वातरंहसे नमः॥ ॐ मनोजवाय नमः॥ ॐ चंदनिने नमः॥ ॐ पद्मनालाग्राय नमः॥ ॐ सुरभ्युत्तारणाय नमः॥ ॐ नराय नमः॥ ॐ कर्णिकारमहास्रग्विणमे नमः॥ ॐ नीलमौलये नमः॥ ॐ पिनाकधृषे नमः॥ ॐ उमापतये नमः॥ ॐ उमाकान्ताय नमः॥ ॐ जाह्नवीधृषे नमः॥ ॐ उमादवाय नमः॥ ॐ वरवराहाय नमः॥ ॐ वरदाय नमः॥ ॐ वरेण्याय नमः॥ ॐ सुमहास्वनाय नमः॥ ॐ महाप्रसादाय नमः॥ ॐ दमनाय नमः॥ ॐ शत्रुघ्ने नमः॥ ॐ श्वेतपिंगलाय नमः॥ ॐ पीतात्मने नमः॥ ॐ परमात्मने नमः॥ ॐ प्रयतात्मने नमः॥ ॐ प्रधानधृषे नमः॥ ॐ सर्वपार्श्वमुखाय नमः॥ ॐ त्रक्षाय नमः॥ ॐ धर्मसाधारणवराय नमः॥ ॐ चराचरात्मने नमः॥ ॐ सूक्ष्मात्मने नमः॥ ॐ अमृतगोवृषेश्वराय नमः॥ ॐ साध्यर्षये नमः॥ ॐ आदित्यवसवे नमः॥ (९००)

ॐ विवस्वत्सवित्रमृताय नमः॥ ॐ व्यासाय नमः॥ ॐ सर्गसुसंक्षेपविस्तराय नमः॥ ॐ पर्ययोनराय नमः॥ ॐ ऋतवे नमः॥ ॐ संवत्सराय नमः॥ ॐ मासाय नमः॥ ॐ पक्षाय नमः॥ ॐ संख्यासमापनाय नमः॥ ॐ कलायै नमः॥ ॐ काष्ठायै नमः॥ ॐ लवेभ्यो नमः॥ ॐ मात्रेभ्यो नमः॥ ॐ मुहूर्ताहः॥क्षपाभ्यो नमः॥ ॐ क्षणेभ्यो नमः॥ ॐ विश्वक्षेत्राय नमः॥ ॐ प्रजाबीजाय नमः॥ ॐ लिंगाय नमः॥ ॐ आद्यनिर्गमाय नमः॥ ॐ सत् स्वरूपाय नमः॥ ॐ असत् रूपाय नमः॥ ॐ व्यक्ताय नमः॥ ॐ अव्यक्ताय नमः॥ ॐ पित्रे नमः॥ ॐ मात्रे नमः॥ ॐ पितामहाय नमः॥ ॐ स्वर्गद्वाराय नमः॥ ॐ प्रजाद्वाराय नमः॥ ॐ मोक्षद्वाराय नमः॥ ॐ त्रिविष्टपाय नमः॥ ॐ निर्वाणाय नमः॥ ॐ ह्लादनाय नमः॥ ॐ ब्रह्मलोकाय नमः॥ ॐ परागतये नमः॥ ॐ देवासुरविनिर्मात्रे नमः॥ ॐ देवासुरपरायणाय नमः॥ ॐ देवासुरगुरूवे नमः॥ ॐ देवाय नमः॥ ॐ देवासुरनमस्कृताय नमः॥ ॐ देवासुरमहामात्राय नमः॥ ॐ देवासुरमहामात्राय नमः॥ ॐ देवासुरगणाश्रयाय नमः॥ ॐ देवासुरगणाध्यक्षाय नमः॥ ॐ देवासुरगणाग्रण्ये नमः॥ ॐ देवातिदेवाय नमः॥ ॐ देवर्षये नमः॥ ॐ देवासुरवरप्रदाय नमः॥ ॐ विश्वाय नमः॥ ॐ देवासुरमहेश्वराय नमः॥ ॐ सर्वदेवमयाय नमः॥(९५०)

ॐ अचिंत्याय नमः॥ ॐ देवात्मने नमः॥ ॐ आत्मसंबवाय नमः॥ ॐ उद्भिदे नमः॥ ॐ त्रिविक्रमाय नमः॥ ॐ वैद्याय नमः॥ ॐ विरजाय नमः॥ ॐ नीरजाय नमः॥ ॐ अमराय नमः॥ ॐ इड्याय नमः॥ ॐ हस्तीश्वराय नमः॥ ॐ व्याघ्राय नमः॥ ॐ देवसिंहाय नमः॥ ॐ नरर्षभाय नमः॥ ॐ विभुदाय नमः॥ ॐ अग्रवराय नमः॥ ॐ सूक्ष्माय नमः॥ ॐ सर्वदेवाय नमः॥ ॐ तपोमयाय नमः॥ ॐ सुयुक्ताय नमः॥ ॐ शोभनाय नमः॥ ॐ वज्रिणे नमः॥ ॐ प्रासानाम्प्रभवाय नमः॥ ॐ अव्ययाय नमः॥ ॐ गुहाय नमः॥ ॐ कान्ताय नमः॥ ॐ निजसर्गाय नमः॥ ॐ पवित्राय नमः॥ ॐ सर्वपावनाय नमः॥ ॐ श्रृंगिणे नमः॥ ॐ श्रृंगप्रियाय नमः॥ ॐ बभ्रवे नमः॥ ॐ राजराजाय नमः॥ ॐ निरामयाय नमः॥ ॐ अभिरामाय नमः॥ ॐ सुरगणाय नमः॥ ॐ विरामाय नमः॥ ॐ सर्वसाधनाय नमः॥ ॐ ललाटाक्षाय नमः॥ ॐ विश्वदेवाय नमः॥ ॐ हरिणाय नमः॥ ॐ ब्रह्मवर्चसे नमः॥ ॐ स्थावरपतये नमः॥ ॐ नियमेन्द्रियवर्धनाय नमः॥ ॐ सिद्धार्थाय नमः॥ ॐ सिद्धभूतार्थाय नमः॥ ॐ अचिन्ताय नमः॥ ॐ सत्यव्रताय नमः॥ ॐ शुचये नमः॥ ॐ व्रताधिपाय नमः॥ ॐ पराय नमः॥ ॐ ब्रह्मणे नमः॥ ॐ भक्तानांपरमागतये नमः॥ ॐ विमुक्ताय नमः॥ ॐ मुक्ततेजसे नमः॥ ॐ श्रीमते नमः॥ ॐ श्रीवर्धनाय नमः॥ ॐ श्री जगते नमः॥ (१०००)

ॐ पूर्णमदः॥ पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।।
ॐ शांतिः॥ शांतिः॥ शांतिः॥  

शिवाष्टोत्तरशत नामावलिः

ॐ नमः शिवाय॥ शिवाष्टोत्तरशत नामावलिः
कर्पूर-गौरं करुणावतारं संसार-सारं भुजगेन्द्र-हारम्।
सदा वसन्तं ह्यदयारविन्दं भवं भवानी सहितं नमामि॥

ॐ शिवाय नमः ॥
ॐ महेश्वराय नमः ॥
ॐ शंभवे नमः ॥
ॐ पिनाकिने नमः ॥
ॐ शशिशेखराय नमः ॥
ॐ वामदेवाय नमः ॥
ॐ विरूपाक्षाय नमः ॥
ॐ कपर्दिने नमः ॥
ॐ नीललोहिताय नमः ॥
ॐ शंकराय नमः ॥
ॐ शूलपाणिने नमः ॥
ॐ खट्वांगिने नमः ॥
ॐ विष्णुवल्लभाय नमः ॥
ॐ शिपिविष्टाय नमः ॥
ॐ अंबिकानाथाय नमः ॥
ॐ श्रीकण्ठाय नमः ॥
ॐ भक्तवत्सलाय नमः ॥
ॐ भवाय नमः ॥
ॐ शर्वाय नमः ॥
ॐ त्रिलोकेशाय नमः ॥
ॐ शितिकण्ठाय नमः ॥
ॐ शिव प्रियाय नमः ॥
ॐ उग्राय नमः ॥
ॐ कपालिने नमः ॥
ॐ कामारये नमः ॥
ॐ अन्धकासुरसूदनाय नमः ॥
ॐ गंगाधराय नमः ॥
ॐ ललाटाक्षाय नमः ॥
ॐ कलिकालाय नमः ॥
ॐ कृपानिधये नमः ॥
ॐ भीमाय नमः ॥
ॐ परशुहस्ताय नमः ॥
ॐ मृगपाणये नमः ॥
ॐ जटाधराय नमः ॥
ॐ कैलाशवासिने नमः ॥
ॐ कवचिने नमः ॥
ॐ कठोराय नमः ॥
ॐ त्रिपुरान्तकाय नमः ॥
ॐ वृषंगिणे नमः ॥
ॐ वृषभारूढाय नमः ॥
ॐ भस्मोद्धूलित विग्रहाय नमः ॥
ॐ सामप्रियाय नमः ॥
ॐ स्वरमयाय नमः ॥
ॐ त्रयीमूर्तये नमः ॥
ॐ अनीश्वराय नमः ॥
ॐ सर्वज्ञाय नमः ॥
ॐ परमात्मने नमः ॥
ॐ सोमसूर्याग्निलोचनाय नमः ॥
ॐ हविषे नमः ॥
ॐ यज्ञमयाय नमः ॥
ॐ सोमाय नमः ॥
ॐ पंचवक्त्राय नमः ॥
ॐ सदाशिवाय नमः ॥
ॐ विश्वेश्वराय नमः ॥
ॐ वीरभद्राय नमः ॥
ॐ गणनाथाय नमः ॥
ॐ प्रजापतये नमः ॥
ॐ हिरण्यरेतसे नमः ॥
ॐ दुर्धर्षाय नमः ॥
ॐ गिरीशाय नमः ॥
ॐ अनघाय नमः ॥
ॐ भुजंगभूषणाय नमः ॥
ॐ भर्गाय नमः ॥
ॐ गिरिधन्वने नमः ॥
ॐ गिरिप्रियाय नमः ॥
ॐ कृत्तिवाससे नमः ॥
ॐ पुरारातये नमः ॥
ॐ भगवते नमः ॥
ॐ प्रमथाधिपाय नमः ॥
ॐ मृत्युंजयाय नमः ॥
ॐ सूक्ष्मतनवे नमः ॥
ॐ जगद्व्यापिने नमः ॥
ॐ जगद्गुरुवे नमः ॥
ॐ व्योमकेशाय नमः ॥
ॐ महासेनजनकाय नमः ॥
ॐ चारुविक्रमाय नमः ॥
ॐ रुद्राय नमः ॥
ॐ भूतपतये नमः ॥
ॐ स्थाणवे नमः ॥
ॐ अहिर्बुध्न्याय नमः ॥
ॐ दिगंबराय नमः ॥
ॐ अष्टमूर्तये नमः ॥
ॐ अनेकात्मने नमः ॥
ॐ सात्विकाय नमः ॥
ॐ शुद्धविग्रहाय नमः ॥
ॐ शाश्वताय नमः ॥
ॐ खण्डपरशवे नमः ॥
ॐ रजसे नमः ॥
ॐ पाशविमोचनाय नमः ॥
ॐ मृडाय नमः ॥
ॐ पशुपतये नमः ॥
ॐ देवाय नमः ॥
ॐ महादेवाय नमः ॥
ॐ अव्ययाय नमः ॥
ॐ हरिपूषणेए नमः ॥
ॐ दन्तभिदे नमः ॥
ॐ त्रिलोचनाय नमः ॥
ॐ अव्यग्राय नमः ॥
ॐ दक्षाध्वरहराय नमः ॥
ॐ हराय नमः ॥
ॐ भगनेत्रभिदे नमः ॥
ॐ अव्यक्ताय नमः ॥
ॐ सहस्राक्षाय नमः ॥
ॐ सहस्रपदे नमः ॥
ॐ अपवर्गप्रदाय नमः ॥
ॐ अनन्ताय नमः ॥
ॐ तारकाय नमः ॥
ॐ परमेश्वराय नमः ॥
॥इति श्रीशिवाष्टोत्तरशत नामावली

सोळा सोमवार व्रत माहिती

'"सोळा सोमवार" म्हणजे लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेला अर्ध्या दिवसाचा उपास. हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे, असे सांगितले जाते. श्रद्धाळू लोक हे व्रत, सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी, दु:ख-दारिद्ऱ्य-रोगराई जाण्यासाठी, मनींची कोणतीहि सदिच्छा पूर्ण होण्यासाठी, बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावर तो नवस फेडण्यासाठी, किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी करतात.
व्रत करणाऱ्या स्त्रीने वा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे, अशी अपेक्षा असते.
व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात. त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवतात. १६ सोमवार व्रत केल्यावर येणाऱ्या १७व्या सोमवारी व्रताचे उद्यापन करतात. १७व्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी व्रताचे उद्यापन करता येते.
व्रत करणारा दिवसभर उपास करतो. ज्याल उपास जमत नाहीत त्याने शिरा, खीर वगैरे "गहू, गूळ व तूप" मिळून तयार केलेले पदार्थ खाल्ले तरी चालते.
व्रत करणारा संध्याकाळी आंघोळ करून शंकराच्या मूर्तीची किंवा चित्राची बेलाच्या पानांसह पंचमोपचार पूजा करतो व "सोळा सोमवार कथा."(कहाणी) किंवा "सोळा सोमवार माहात्म्य " ही पोथी वाचतो. नंतर "शिवस्तुती" म्हणून आरती करतो. त्यानंतर कणकेच्या चूरम्याचा प्रसाद वाटतात. ह्याच गोष्टी लागोपाठच्या सोळा सोमवारी करतात.

कणकेचा चूरमा संपादन करा

तुपात खरपूस तळलेल्या गव्हाच्या पिठाच्या जाडसर खरपूस भाजलेल्या भाकऱ्यांचा किंवा मुटक्यांचा कुसकरा करून तो चाळतात. त्यांत योग्य प्रमाणात गूळ व तूप घातल्यावर चूरमा बनतो. त्याचे पेढे किंवा लाडू केले तरी हरकत नसते. व्रत करणाऱ्याने अर्धाशेर कणिकेचा चूरमा खाणे अपेक्षित असते. उपास सोडताना मीठ खाणे वर्ज्य असते.

व्रताचे उद्यापन संपादन करा

*' उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पाच किलो कणकेचा चूरमा लागतो. पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या आणिअबीर, गुलाल, शेंदूर, हळद, कुंकू, फुले, चंदनाचे गंध, अक्षता, धूप, दीप, कापूर, सुपारी, देठाची खायची पाने, फळ, १०८ किंवा १००८ बेलाची पाने व नैवेद्य या सोळा वस्तू असतात. देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यावर नैवेद्य दाखवून आरती करतात. मनांतल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्याविषयी प्रार्थना करतात व चूरम्याचे तीन भाग करून एक भाग देवापुढे ठेवावा, दुसरा देवळातल्या ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा व तिसरा भाग घरी आणावा. *शंकराचे देऊळ जवळपास नसल्यास, किंवा देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलावून शंकराची षोडशोपचार पूजा करता येते. ब्राह्मणही न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरी चालते. *उद्यापनाच्या दिवशी देवळांत पूजा करून घरी आल्यावर किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावर मागील १६ सोमवारांप्रमाणे "सोळा सोमवार कथा" व "सोळा सोमवार माहात्म्य" वाचतात. "शिवस्तुती" म्हणून आरती करतात; चूरम्याचा प्रसाद सर्वांना वाटून स्वतः खातात. कुटुंबातले सर्वजण पंचपक्वान्नाचे भोजन करतात.

हे व्रत मनोभावे करणाऱ्याची इच्छा श्रीशंकर पूर्ण करतात, अशी मान्यता आहे.

सोळा सोमवारची (परंपरागत) कहाणी संपादन करा

आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक महादेवाचं देऊळ होत. एके दिवशी काय झालं? शिवपार्वती फिरतां फिरतां त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली, "डाव कोणी जिंकला?" म्हणून पार्वतीनं गुरवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरवाला "तूं कोडी होशील" म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊं लागल्या. पुढं एके दिवशीं काय झालं ? देऊळीं स्वर्गींच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण पुशिलं. गुरवानं गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, "भिऊं नको. घाबरू नको. तूं सोळा सोमवारांचं व्रत कर, म्हणजे तुझं कोड जाईल." गुरव म्हणाला, "तें व्रत कसं करावं?" अप्सरांनी सांगितलं, "सारा दिवस उपवास करावा. संध्याकाळी आंघोळ करावी. शंकराची पूजा करावी. नंतर अर्धा शेर कणीक घेऊन त्यांत तूप गूळ घालावा व तें खावं. मीठ त्या दिवशी खाऊं नये. त्याप्रमाणं सोळा सोमवार करावे. सतरावे सोमवारी पांच शेर कणीक घ्यावी, त्यांत तूप गूळ घालून चूर्मा करावा. तो देवळीं न्यावा. भक्तीनं शंकराची षोडशोपचारें पूजा करावी. नंतर चूर्म्याचा नैवेद्य दाखवावा. पुढं त्याचे तीन भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देउळीं ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं." असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं गुरवानं ते व्रत केलं, गुरव चांगला झाला.

पुढं काही दिवसांनी शंकरपार्वती पुन्हां त्या देउळीं आलीं. पार्वतीनं गुरवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरवाला विचारलं, "तुझं कोड कशानं गेलं?" गुरवानं सांगितलं, "मी सोळा सोमवारांचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं." पार्वतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिकस्वामी परत यावा म्हणून हें व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक-स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, "आई आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो, आणि मला पुन्हां तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय?" पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढें कार्तिकस्वामीनं तें व्रत केलं.

त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ह्याची सहज रस्त्यांत भेट झाली. पुढें कार्तिकस्वामीनं हें व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतु मनांत धरला. मनोभावे सोळा सोमवारांचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरतां फिरतां एका नगरांत आला. तिथं काय चमत्कार झाला? तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढं राजानं हत्तिणीच्या सोंडेत माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यांत हत्तिण घालील, त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पहायला गेला होता. पुढं कर्मधर्मसंयोगानं ती माळ हत्तिणीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यांत घातली, तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं, व नवरानवरींची बोळवण केली.

पुढं काय झालं? राजाची मुलगी मोठी झाली. तशीं दोघं नवराबायको एका दिवशी खोलींत बसली आहेत, तसं बायकोनं नवर्याला विचारलं, "कोणत्या पुण्यानं मी आपणांस प्राप्त झालें?" त्यानं तिला सोळा सोमवारांच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचीति पाहण्याकरितां पुत्रप्राप्तीचा हेतु मनात धरला व तें व्रत ती करूं लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की, "मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालों?" तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनांत धरली. तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला? फिरतां फिरतां तो एका नगरांत गेला. त्या राजाला मुलगा नव्हता. एक मुलगी मात्र होती. तेव्हां कोणीतरी एकादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी, व राज्यही त्यालाच द्यावं, असा त्यानं विचार केला. अनायासं त्या पुत्राची गांठ पडली. राजानं त्याला पाहिलं तो राजचिन्हं त्याच्या दृष्टीस पडलीं. राजानं त्याला आपल्या घरी आणलं, कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं.

इतकं होतं आहे तों त्या ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देऊळी गेला. घरीं बायकोला निरोप पाठविला की, पांच शेर कणकीचा चुर्मा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनांत आणला. चुर्म्याला लोक हसतील, म्हणून एका तबकांत पांचशें रुपये भरून ते पाठवून दिले. चुर्मा वेळेवर आला नाहीं, व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांतदिला. तो काय दिला? राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील. दारिद्यानं पिडशील. असा शाप दिला. पुढं दुसरे दिवशीं ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली. तो म्हणाला, महाराज, "राज्य हें तिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील, याकरितां असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टान्त, अमान्य करणं हेंही अयोग्य आहे." मग उभयतांनी विचार केला. तिला नगरांतून हाकलून लावलं.

पुढं ती दीन झाली, रस्त्यानं जाऊं लागली. जातां जातां एका नगरात गेली. तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊंपिऊं घातलं. पुढं काय झालं ? एके दिवशीं म्हातारीन तिला चिवटं विकायला पाठवलं. दैवाची गति विचित्र आहे! बाजारांत ती चालली. मोठा वारा आला, सर्व चिवटं उडून गेलीं. तिनं घरीं येऊन म्हातारीला सांगितलं. तिनं तिला घरांतून हांकलून लावलं. तिथून निघाली तों एका तेल्याच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्यांजवर तिची नजर गेली. तसं त्यांतलं सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेनं जाऊ लागली. जातां जातां एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होतं. पण तिची दृष्टि त्याजवर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढं जातां जातां एक सुंदर तळं लागलं. त्याजवर तिची दृष्टि गेली, तसे पाण्यांत किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्यासारखे तळ्यावर गुराखी आले. नासकं पाणी पाहून मागं परतले. गुरंढोरं तान्हेली राहिली. पुढं काय झालं? एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपले घरी घेऊन आला. तिथं राहून ती कामधंदा करू लागली. तशी जिकडे तिकडे तिची दृष्टि जाऊं लागली. ज्यांत तिची दृष्टि जाई त्यांत किडे पडावे, कांही जिनसा आपोआप नाहीशा व्हाव्या, असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्यानं विचार केला, अंतदृष्टि लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं. तें नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टि चांगली होणार नाहीं असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं तिला सोळा सोमवारांचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवारांचं व्रत करविलं, तसा परमेश्वराचा कोप नाहींसा झाला.

तिच्या नवर्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली. दूत चोहिंकडे शोधाला पाठवले. शोधतां शोधतां तिथ आले. गोसाव्याच्या मठींत राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनीं सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधानसुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रप्रावर्ण देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, राजा राजा, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं, ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा, व चांगल्या रीतीनं पाणिग्रहण करून सुखानं नांद." राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरीं आला. पुढं मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजाराणींची भेट झाली. आनंदानं रामराज्य करूं लागलीं.

तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं देवाब्राह्मणांचे द्वारीं, गाईंचे गोठीं, पिंपळाचे पारीं, सुफळ संपूर्ण.

बारा ज्योतिरर्लिंगाची संक्षिप्त माहिती

१. सोमनाथ -

सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.

२. मल्लिकार्जुन -

गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याकिरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.

३. महाकाळेश्वर -

उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप 

४. अमलेश्वर -

ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात. ओंकारेश्वराची शाही स्वारी.
 
५. वैद्यनाथ -

शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.

६. भीमाशंकर -

भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.

७. रामेश्वर -

दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.

८. नागेश्वर -

श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.

९. काशीविश्वेश्वर -

वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो.
शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप 

10. त्र्यंबकेश्वर -

नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले.
ओम त्र्यंबकम यजामहे... 

११. केदारेश्वर -

हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.

१२. घृष्णेश्वर - 

घृश्मेश्वर दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.

|| शिव स्तुती ||

कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥
रवींदुदानावल पूर्ण भाळीं ।
स्वतेज नेत्रीं तिमीरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥
जटा विभूती उटि चंदनाची ।
कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥
वैराग्य योगी शिव शूलपाणी ।
सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥४॥
उदारमेरु पति शैलजेचा ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी तो गजचर्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥५॥
ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ ।
भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरी दोष महविदारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥६॥
कपूरगौरी गिरीजा विराजे ।
हळाहळें कंठ निळाच साजे ।
दारिद्र्य दुःख स्मरणें निवारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥७॥
स्मशानक्रीडा करिता सुखावे ।
तो देवचूडामणि कोण आहे ।
उदासमूर्ती जटाभस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥८॥
भूतादिनाथ अरि अंतकाचा ।
तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥९॥
नंदी हराचा हर नंदिकेश ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१०॥
भयानक भीम विक्राळ नग्न ।
लीलाविनोदें करि काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥११॥
इच्छा हराची जग हे विशाळ ।
पाळी रची तो हरि ब्रह्मगोळ ।
उमापती भैरव विघ्नहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१२॥
भागीरथीतीर सदा पवित्र ।
जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१३॥
प्रयाग वेणी सकळा हराच्या ।
पदारविंदी वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१४॥
कीर्ती हराची स्तुती बोलवेना ।
कैवल्यदाता मनुजा कळेना ।
एकाग्रनाथ विष अंगिकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१५॥
सर्वांतरी व्यापक जो नियंता ।
तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकी उमा ते गिरिरुपधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१६॥
सदा तपस्वी असे कामधेनु ।
सदा सतेज शतकोटी भानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१७॥
कर्पूरगौर स्मरल्या विसावा ।
चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंती स्वहितसुचना विचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१८॥
विरामकाळी विकळे शरीर ।
उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनि चित्तहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१९॥
सुखावसानीं सकळें सुखाची ।
दुःखावसानी टळती जगाचीं ।
देहावसानी धरणी थरारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२०॥
अनुहतशब्द गगनी न माय ।
तिचेनि नादें भव शून्य होय ।
कथा निजांगे करुणा कुमारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२१॥
शांतिस्वलीला वदनीं विलासे ।
ब्रह्मांडगोळीं असुनी न दिसे ।
भिल्ली भवानी शिवब्रह्मचारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२२॥
पीतांबरें मंडित नाभि ज्याची ।
शोभा जडीत वरि किंकिणींची ।
श्रीवेददत्त दुरितान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२३॥
जिवाशिवांची जडली समाधी ।
विटला प्रपंचीं तुटली उपाधी ।
शुद्धस्वरे गर्जती वेद चारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२४॥
निदान कुंभ भरला अभंग ।
पहा निजांगे शिव ज्योतिर्लिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२५॥
मंदार बिल्वें बकुलें सुवासी ।
माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्व तारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२६॥
जाई जुई चंपक पुष्पजाती ।
शोभे गळा मालतिमाळ हातीं ।
प्रतापसूर्य शरचापधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२७॥
अलक्ष्यमुद्रा श्रवणी प्रकाशे ।
संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।
नेई सुपंथे भवपैलतारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२८॥
नागेशनामा सकळां जिव्हाळा ।
मना जप रे शिवयंत्रमाळा ।
पंचाक्षरी ध्यानगुहा विहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२९॥
एकान्ति ये रे गुरुराजस्वामी ।
चैतन्यरुपी शिव सूखनामी ।
शिणलों दयाळा बहुसाळ भारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३०॥
ॐ तत्व पूरुषाय् विदमेह |
महादेवाय धिमहि |
तन्नो रुद्र प्रचोदयात् |

शिव उपासना माहात्म्य

भोळ्या शिवशंकरजींची आराधना श्रावणी सोमवारी केली तर आपल्या सर्व मनोकामना सिध्दीस जातात अशी आपल्या सर्वांची श्रध्दा आहे! 
आपले सांसारिक दुःख हरण करण्यासाठी, मनःशांती लाभण्यासाठी आणि व्यवहारातील दोषही दूर होवून स्थैर्य लाभण्यासाठी भगवान शिव शंभोंची पुजा केली जाते!

या श्रावणी सोमवारी भाविक उपवास करतात. पहाटे लवकर उठून स्नानादी कर्म पूर्ण करुन शिवमंदिरात जातात. शिवलिंगाला जल स्नान घडवितात. यानंतर भगवान शिव यांना त्रिदल असणारे, न फाटलेले, न भंगलेले असे बेल पत्र अर्पण करतात! बेलपत्राच्या तीन पानांमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश असे त्रिदेव वास करतात. तसेच हे त्रिदल बेल पत्र भगवान शिव शंकरांना अर्पण केल्याने आपल्या देहिक, मानसिक आणि आत्मिक अशा तिन्ही पापांचा नाश होतो असे मानतात. बिल्व पत्र अर्पण करतांना ती १, ११, १०८ अशा विषम संख्येने अर्पण केल्यास आपल्या सर्व मनोकामना पुर्ण होतात!

भगवान भोलेनाथांची पुजा करतांना "ॐ महाशिवाय सोमाय नम:" हा मंत्र जपत शिवलिंगाला गाईचे दूध अर्पण केल्यामूळे तन,मन आणि धन यात निर्माण होणा-या कलहांची शांती होते असे मानतात!

भोलेशंकर महादेवाला मधाची धार अर्पण केल्यावर आयुष्यातील नोकरी आणि व्यवसायासंबधीच्या समस्यांचा अंत होतो अशी श्रध्दा आहे. तसेच शिवशंभो महादेवाला लाल चंदन चढविल्याने आयुष्यातही शांती आणि सुख-समृद्धी नांदते यावर विश्वास आहे! शितलता हा चंदनाचा गुणधर्म असल्याने जीवनातही शितलता येते! यानंतर भगवान शिवजींना बेल पत्रांसोबत गंध,अक्षता, फुले व नैवेद्य अर्पण करावेत. विधिवत पूजा करावी. शिवलिंगाला अर्पण केलेल्या दूध आणि मधाच्या चरणामृताचा प्रसाद ग्रहण करावा आणि भाळी चंदन लावून मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करतात! यासोबतच शिव मंदिरात रूद्राभिषेक मोठ्या भक्तीभावाने केला जातो! शिवभक्तीत रुद्राभिषेकाचे विशेष महत्व आहे! या रूद्राभिषेकासाठी दूध, तूप, गंगाजल यांचे विशेष महत्व आहे! शिवमंदिरात पुजाविधी आटोपल्यावर भगवान भोलेनाथांची आरती श्रध्दापूर्वक म्हणतात.

भगवान शिवाची आरती (समर्थ रामदासस्वामीकृत)

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।। १ I।

जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।धृ०।।

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। २ ।।

जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।

देवीं दैत्यीं सागरमंथन पै केले ।
त्यामाजी अवचित हालाहल जे उठले ।
ते त्वा असुरपणे प्राशन केले ।
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ।। ३ ।।

जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ।। ४ ।।

जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।।

लग्नानंतरच्या--पाहिल्या श्रावणी सोमवार व्रताची व शिवमुठ माहिती 

देवांचा देव महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्रावणी सोमवारचे व्रत असते या दिवशी शंकराला शिवमूठ दिली जाते. भगवान शिवपूजन करतांना भोलेनाथाला "शिवामूठ" म्हणजे धान्य अर्पण करतात. भगवान शिवजींच्या कृपादृष्टीने शेतात आलेले धान्य श्री शिवचरणी अर्पण करुन त्यांचे ऋण व्यक्त करतात. श्रावणात प्रत्येक सोमवारी वेगवेगळी शिवामूठ अर्पण करतात. श्रावण महिन्यातील शिवामूठ अर्पण करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे मानतात-

शिवामूठ : पहिला सोमवार - तांदूळ
शिवामूठ : दुसरा सोमवार - तीळ
शिवामूठ : तिसरा सोमवार - मूग
शिवामूठ : चौथा सोमवार - जवस
शिवामूठ : पाचवा सोमवार - सातू.

शंकराच्या पिंडीवर बेल, हातातील धान्य वाहून पुढील प्रार्थना करतात,

नोट:- स्त्रीयांनी पुजन करता फक्त 'नमःशिवाय' असा मंत्र म्हणावा आणि पुढील वाक्य म्हणून शिव मुठ वाहावी

"शिवा शिवा, महादेवा, माझी शिवामुठ, ईश्वरादेवा, सासूसासरां, दिराभावा, नणंदजावा, भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा!"  
दिवसभर उपास करतात व रात्री तो मुक्याने जेवुन सोडतात. 

या व्रताप्रमाणे काही ठिकाणी फसकीचे व्रत देखील करतात. ते असे, पसाभर तांदूळ घेऊन महादेवाची पूजा करतात, "जय महादेवा, घे फसकी व दे लक्ष्मी" असं म्हणून हातातील तांदूळ पिंडीवर वाहतात व राहीलेले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहतात.
पहिल्या सोमवारी तांदळाची, दुसर्‍या सोमवारी तिळाची, तिसर्‍या सोमवारी मुगाची, चौथ्या सोमवारी जवस आणि पाचवा असेल तर सातूची शिवमूठ वाहिली जाते.

श्रावणी सोमवारची पौराणिक कथा

श्रावणी सोमवारची पौराणिक कथा अशी आहे की, देवी सतीने शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरुपात मिळवण्याचा प्रण केल्यानंतर देवी सतीने, तिचे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता. देवी सतीने आपल्या दुस-या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या पोटी मुलीच्या रुपात जन्म घेतला. पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला. हा काळ श्रावण महिन्याचा होता. त्यामूळे भगवान महादेवाची श्रावण महिन्यात श्रध्देने पुजा-अर्चा करतात. या कथेच्या अनुषंगाने श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात.

प्रथम श्रावणी सोमवार कहाणी 

सोमवारची खुलभर दुधाची कहाणी

जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गर्भाऱ्यात घातलं. तुझ्या गर्भारा भरला नाही, माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही. पण मी आपली भावे भक्तीनं अर्पण करते.
ऐका परमेश्वरा सोमवारा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गर्भारा दुधानं भरावा. परंतु हे घडेल कसं? अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ती सांगितली. दवंडी पिटली, “गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं”. सर्वांना धाक पडला. घरोघरची माणसं घाबरून गेली. कोणाला काही सुचेनासं झालं. त्याप्रमाणं घरात कोणी दूध ठेवलं नाही. वासरांना पाजलं नाही, मुलांना दिलं नाही. सगळे दूध देवळात नेलं. गावचं दूध सगळं गर्भाऱ्यात पडलं, तरी देवाचा गर्भारा भरला नाही.
दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती, तिनं घरचं कामकाज आटपलं, मुलांबाळांना खाऊं घातलं, लेकीसुनांना न्हाऊं घातलं, गाईवासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं, चार तांदुळाचे दाणे घेतले, दोन बेलाची पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळात आली. मनोभावे पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. “जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गर्भाऱ्यात घातलं. तुझ्या गर्भारा भरला नाही, माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही. पण मी आपली भावे भक्तीनं अर्पण करते”. असं म्हणून राहिलेलं दूध गर्भारी अर्पण केलं. पूजा घेऊन मागं परतली.
इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गर्भारा भरून गेला. हे गुरवानं पाहिलं, राजाला कळवलं, परंतु त्याचा काही केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळी बसवले. तरीही शोध लागला नाही. चमत्कारही असाच झाला. पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीचे वेळेस गर्भारा भरला. राजानं तिचा हात धरला. म्हातारी घाबरून गेली, तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं, “तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांचे हायहाय माथी आले. हे देवाला आवडत नाही, म्हणुन गर्भारा भरत नाही”. “याला युक्ति काय करावी”? “मुलांवासरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनी आनंद करावा. देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गर्भारा भरेल. देव संतुष्ट होईल”. म्हातारीला सोडून दिलं. गावात दवंडी पिटविली.
चवथ्या सोमवारी राजानं पूजा केली. मुलांबाळांना गाईवासरांना दूध ठेऊन उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहातात तो देवाचा गर्भारा भरून आला. राजाला आंनद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकीसुना घेऊन म्हातारी सुखानं नांदू लागली.
तसं तुम्ही आम्ही नांदू. ही साठां उत्तराची कहाणी, पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
।।   ॐ  नम :  शिवाय ।।

॥उपासना महिमा॥

सृष्टीचा निर्माणकर्ता श्री ब्रम्हदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव हे आहेत. म्हणूनच मृत्यू किंवा मोक्ष या वर श्री महादेवाचा अंकुश आहे असे म्हटले जाते. तसेच गतजन्मातील संचित पातकांमुळे आपणास या जन्मात आकस्मिक मृत्यू , मतीमंदत्व, मानसिक व शारीरिक आसाद्य आजार, दुखे:, संकटे, हालअपेष्टा किंवा दारिद्र्य भोगावे लागते. या सर्वां पासून मुक्ती देण्याचे कार्य श्री महादेव करतात. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण, निराकार परब्रम्ह होय.अशा या मोक्षकारी महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी जो कोणी शिवाची उपासना करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. एकूणच या दिवशी केलेली उपासना हि मानवी जीवनाला सुख शांती व समृद्धी देण्याचा एक राज मार्ग आहे, अशी हि फलदायी उपासना आहे.

आता तुम्ही विचाराल हि उपासना करतात कशी ?
ज्या कोणाला आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करावयाची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने मग तो कोणत्याही जातीचा असो व धर्माचा असो त्याने हि उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. व श्री महादेव म्हणजे सर्वात लवकर व साध्या पूजेने सुद्धा अति प्रसन्न होणारे दैवत आहे. म्हणूनच या देवाला भोळा शंकर असेही म्हटले जाते. एवढेच नाही तर आपल्या हातून अगदी अजाणते पणे जरी शिव पूजा घडली तरी हा भोळा शंकर लगेच प्रसन्न होतो. आणि उपासना करणे म्हणजे तरी काय ?

ज्या प्रमाणे आपण आपल्या प्रीय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करतो किंवा त्या व्यक्तीला आवडणार्या वस्तू आपण भेट देतो त्याच प्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करणे किंवा त्या देवतेला त्या गोष्टी अर्पण करणे किंवा भेट देणे म्हणजेच त्या देवतेची उपासना करणे असे होय.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात त्याने भोळा महादेव लगेच प्रसन्न होतो. मग महादेवाला कोणत्या गोष्टी आवडतात ?

१) अभिषेक:- महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. मग तो अभिषेक तुम्ही साधे पाणी, दुध, दही किंवा उसाचा रस या पैकी कोणत्याही द्रव्याने केलात तरी चालतो.

२) फुले:- महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्यास तो लगेच प्रसन्न होतो. मग आपण पांढरी फुले मुख्यत्वे धोतर्याची फुले अर्पण करून महादेवाला प्रसन्न करू शकता.

३) वृक्ष:- महादेवाला बेलाचा वृक्ष तसेच चंदनाचा वृक्ष हे सर्वात प्रीय आहे मग तुम्ही महादेवाला बेलाची पानें किंवा फळे अर्पण करू शकता. तसेच तुम्ही एखादे बेलाचे झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करून ते जरी वाढवलेत व त्याची पूजा केलती तरी त्याचे पुण्य अपार आहे. म्हणून या दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे किंवा हि झाडे दान द्यावीत. त्याने भोळा शंकर प्रसन्न होतो.

४) फळे, धान्य किंवा वस्त्र:- कवठ हे फळ महादेवाला अतिप्रिय आहे तसेच बेल फळ किंवा नारळ हे देखील महादेवाला प्रीय आहेत. महादेवाला मुठभर तांदूळ अर्पण करावेत, किंवा केळी हे फळ महादेवाला अर्पण करावे. किंवा अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी. तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रीय असल्याने ते देखील तुम्ही अर्पण करू शकता.

५) स्तोत्रे:- शिवस्तुती चा पाठ वाचवा. शिवस्तुती हि सर्वात लवकर फलदायी होते. याने महादेव लगेच प्रसन्न होतात. तसेच शिवकवच पठन हे देखील अत्यंत उपयुक्त आहे.

६) उपासना मंत्र:- ।। ओम नम: शिवाय ।।  हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे. या मंत्राच्या सतत च्या जपाने श्री महादेव लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्व मनो: कामना पूर्ण होतात. या मंत्राची शक्ती अद्भुत आहे. ह्या मंत्रासाठी दीक्षा, होम, संस्कार,मुहूर्त,गुरुमुखाने उपदेश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते. या मंत्रात सर्व वेद व उपनिशिध्ये यांचे सार सामावले आहे.

७) दान धर्म:- सध्या कलयुग चालू आहे नि कलयुगात दान देणे हे अनन्य साधारण पुण्यकर्म समजले जाते, म्हणूनच श्री महादेवाला ज्या वस्तू प्रीय आहेत त्या पैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केलीत तर त्याचे हि फळ लाखो पटीने वाढते. या मध्ये तुम्ही दुध, तांदूळ, केळी , खडीसाखर, पांढरे वस्त्र, नारळ, बेलाचे व चंदनाचे झाडांची रोपे या गोष्टी दान देऊ शकता. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुखसमृधी प्राप्त होते यात शंकाच नाही.

८) ध्यान आणि शांतता:- शंभू महादेवाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रीय आहेत. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरावर महादेवाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळी नंतर दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे महादेवाचे ध्यान करावे या वेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात. व घरात बरकत होते. दारिद्र्य दूर होते.

९) मनातली इच्छा बोलणे:- ज्या प्रमाणे मुल रडल्यावर त्याची आई त्याला दुध पाजते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याच प्रमाणे आपण या महादेवाची उपासना केल्यावर हा भोळा शंकर नक्कीच प्रसन्न होतो. नि हा प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे. हि इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी त्याने फळ प्राप्ती लवकर होते.

खाली देलेली हि इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

" हे शंकरा मी तुला शरण आलो आहे. साक्षात तूच माझा आत्मा असून, माझी बुद्धी म्हणजे पार्वती माता होय. माझे प्राण म्हणजे शिवगण आणि देह म्हणजे शिवालय आहे. सारे विषयभोग म्हणजेच तुमची पूजा असून झोप हि समाधी होय. माझे चालणे म्हणजे तुमची प्रदक्षिणा करणे, बोलणे म्हणजे तुमची स्तुती करणे असून मी जी जी कर्मे करतो ती सारी तुमची आराधनाच करतो आहे. माझ्या हात, पाय, वाणी,कान,डोळे,मन,देह या पैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील त्या सर्वाना तू क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. हे महादेवा तुझा जय जय कर असो ! 

महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक राशी नुसार गरिबांना कोणत्या प्रकारचे दान करावे या विषयी थोडेसे ! 

महाशिवरात्रीला शिवशंकरास साध्या थंड पाण्याने अभिषेक केला असता तसेच विविध वस्तूंचे दान गरिबांना केले असता महादेव मनातली इच्चा पूर्ण करतात असा अनुभव आहे. या अभिषेकाचा व दानाचा महिमा अपार आहे. तसेच कुंडलीत ज्या ग्रहांचा दोष आहे ते दोष सुद्धा या दानामुळे दूर होतात.

अभिषेक कसा करावा ?

भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी ॐ नमः शिवाय हा मंत्र म्हणून थंड पाण्याने अभिषेक करावा तसेच बिल्व पत्र , बेल फळ किंवा धोत्र्याचे फुल वाहावे.

राशी नुसार गरिबांना द्यायची दाने खालील प्रमाणे !

मेष- मध , गूळ , उसाचा रस व लाल फुल !
वृषभ - कच्चे दूध, दही, पांढरे फुल !
मिथुन- हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र !
कर्क- कच्चे दूध, लोणी, बिल्वपत्र व पांढरे फुल !
सिंह- मध , गूळ , शुद्ध तूप व लाल पुष्प !
कन्या- हिरव्या फळांचा रस, हिरवे मूग, बिल्वपत्र व निळी फुले !
तुळ - दूध, दही, रंगीत फुले !
वृश्चिक- मध, शुद्ध तूप, गूळ बिल्व पत्र व लाल फुल !
धनु- शुद्ध तूप, मध, बदाम, पिवळे फुल व पिवळे फळ !
मकर- मोहरीचे तेल, तिळाचे तेल, कच्चे दुध, जांभळे, निळे फुल !
कुंभ- कच्चे दुध, मोहरीचे तेल, तिळाचे तेल, निळे फुल !
मीन- उसाचा रस, मध, बदाम, बिल्वपत्र, पिवळे फुल व पिवळे फळ !

विशेष सूचना:-
शिवपूजन कालावधी:- महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजेच २४:२८ ते २५:१८  या कालावधीत वरील पैकी कोणत्याही प्रकारे आपण शिवपूजन केलेत तर महादेव प्रसन्न होतात. या काळात केलेले शिवपूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात शिवाची पूजा करावी त्यांना अभिषेक घालावा, बेलाची पानें अर्पण करावीत. कवठ या फळाचा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करावा. शिवाचे नामस्मरण करावे. शिवस्तुती किंवा शिव स्तोत्रे म्हणावीत. व मनातली इच्छा बोलावी. आपण जी इच्चा बोलाल ती पूर्ण होते असा आहे या महाशिवरात्रीच्या उपासनेचा महिमा.

वरील प्रकारे जर आपण शिवाची उपासना केलीत तर ऐहिक वैभव, स्वास्थ्य व मानसिक शांती लाभेल यात तीळ मात्रही शंका नाही. चला तर मग आता पासूनच उपासनेला सुरवात करून आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुख संपूर्ण बनवूयात.

प्रदोष व्रत

प्रदोष व्रत हे कलियुगा मध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवाची कृपा प्रदान प्रदान करणारे आहे. स्त्री अथवा पुरूष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतात.

प्रदोष व्रत केल्याने आपले सारे दोष नाहीसे होतात
आठवड्यातील सात दिवसांतील प्रदोष व्रताचे विशेष असे महत्व आहे.
[१] रविवारी प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते.
[२] सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते.
[३] मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने आपणांस रोगांपासून मुक्ती मिळते आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो.
[४] बुधवारी प्रदोष व्रत केल्याने आपली कार्य सिद्धी होते.
[५] गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश होतो.
[६] शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते.
[७] शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते.

या व्रताचे महात्म्य पूजनीय गंगा मातेच्या किनाऱ्यावर शुभ मुहूर्तावर वेदऋषी आणि भगवंताचे भक्त श्री सुत महाराजांनी श्री सनकादि ऋषींना सांगितले.
श्री सुत महाराज म्हणाले कि या कलियुगात मनुष्य धर्मचरणापासून भटकून अधर्माच्या मार्गावरून जातअसेल, प्रत्येक ठिकाणी अन्याय आणि अनाचार माजला असेल, मनुष्य आपल्या कर्तव्याला विसरून नीच कर्म करीत असेल, तर अशा वेळी प्रदोष व्रत असे व्रत असेल कि ते व्रत त्या मनुष्याला भगवान शिवाच्या कृपेला पात्र बनवून पुण्य कर्माचा संचय होवून मनुष्यास उत्तम लोकाची प्राप्तीहोईल आणि स्वर्गीय सुख मिळेल. श्री सुत ऋषींनी सनकादि ऋषींना असे हि सांगितले कि प्रदोष व्रताने मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होवून पापांपासून मुक्ती मिळेल. हे व्रत अति कल्याणकारी आहे.या व्रताच्याप्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टीची प्राप्ती होते.

प्रदोष व्रत विधी

●प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत करता येते.सूर्यास्त झाल्या नंतर रात्र होण्याच्या पूर्वीचाकालावधी म्हणजे प्रदोष काळ होय.
●या व्रतात भगवान श्री शंकराची पूजा केली जाते.या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहून व्रतकरावयाचे असते.
●प्रातःकाळी स्नान करून भगवान श्री शंकराला बेल पत्र,गंगाजल अक्षता धूप दीप ओवाळून पूजाकरावी.संध्याकाळी प्रदोष समयी सुद्धा अशीच अभिषेक युक्त पूजा करावी.अशा रीतीने प्रदोष व्रत करण्याने
●व्रतस्थ व्यक्तीला महत पुण्य प्राप्ती होते मनोवांछीत कामे पूर्णत्वास येतात.

शिव उपासना